शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वार्थासाठी नितीश कुमार जातीयवादी शक्तींसोबत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:19 IST

भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला.

नवी दिल्ली : भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला. आपल्या स्वार्थी राजकीय हेतूसाठी नितीश कुमार हे जातीयवादी शक्तींकडे परत गेले असल्याची टीका त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, हे राजकारण तीन ते चार महिन्यांपासून शिजत होते, याची आपल्याला कल्पना होती. बिहारच्या ज्या आघाडीमधून जनता दल युनायटेड पक्ष बाहेर पडला आहे त्या आघाडीचा काँग्रेस पक्ष एक घटक होता. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी जातीयवादी शक्तींविरुद्धच्या लढाईत आमच्यासोबत हात मिळविला होता. पण ज्यांच्याविरुद्ध ते लढले आहेत त्यांच्यासोबतच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे. भारताच्या राजकारणातील हीच मोठी समस्या आहे.बिहारमधील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, राजकारणात लोकांच्या मनात काय चालू आहे याची कल्पना असते. मला हे माहीत होते की, नितीश कुमार अशी काहीतरी योजना आखत आहेत. मागील तीन-चार महिन्यांपासून हे राजकारण सुरू होते. लोक आपल्या स्वार्थी हेतूसाठी काहीही करू शकतात. कोणतेही तत्त्व, विश्वसनीयता राहिली नाही. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात.नितीश कुमार यांचे बदलते राजकारण त्यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही, असे मत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, याबाबत मी अधिक भाष्य करणार नाही. पण नितीश कुमार यांची सतत बदलत जाणारी भूमिका त्यांच्यासाठीच चांगली नाही.संसदेतही भाजपाला पाठिंबा - त्यागीपाटणा : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त जनता दल यापुढे भाजपाला पाठिंबा देईल, अशी घोषणा गुरुवारी त्या पक्षाचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी केली. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर याबाबत बोलताना के. सी. त्यागी म्हणाले की, काँगे्रस पक्ष भ्रष्टाचाराबाबत गंभीर नाही.काँग्रेसवर विश्वास ठेवणे ही मोठी चूक होती. मोदी सरकारमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व यावर निर्णय घेईल. ते म्हणाले की, नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये हा फरक आहे की, नितीश कुमार हे भ्रष्टाचाराबाबत तडजोड करत नाहीत तर राहुल गांधी याबाबत तडजोड करतात.