शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल गांधींना लोकसभेत बसण्याचाही नैतिक अधिकार नाही, राजनाथ सिंह गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 12:48 IST

'हा संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे'

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी बलात्काराच्या मुद्द्यावरुन 'मेक इन इंडिया' ऐवजी 'रेप इन इंडिया' असे विधान करत केंद्र सरकारवर टीका केली होती. यावरुन लोकसभेत शुक्रवारी सत्ताधारी भाजपाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. यावेळी राहुल गांधींना लोकसभेचे सदस्य होण्याचा किंवा खासदार म्हणून इथे बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडिया अभियान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 'आयात करणारा देश' ही भारताची ओळख बदलून निर्यातदार देश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजनाही राबवल्या जाताहेत. त्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगार मिळू शकतील. परंतु, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी 'मेक इन इंडिया'वरून जो शब्दप्रयोग केला आहे, तो अस्वस्थ करणारा, जनभावना दुखावणारा आहे. असा शब्दच्छल करणारे लोकही या सभागृहात निवडून येऊ शकतात का? असा सवाल करत राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. 

याचबरोबर, आमच्या पक्षातील काही व्यक्तींनी अपशब्द वापरले होते, तेव्हा आम्ही त्यांना बोलावून खेद व्यक्त करायला, माफी मागायला सांगितली होती. मात्र, राहुल गांधी यांनी फक्त या सभागृहाचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. 

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. एका पक्षाचे नेते 'रेप इन इंडिया' असे बोलतात. देशातील महिलांचा बलात्कार करायला या, असे विधान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केले असेल. हा महिलांचा अपमान सहन करणार नाही. गांधी कुटुंबातील व्यक्तीने असे विधान करुन देशातील महिलांचा अपमान केला. हा संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे, असे म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाParliamentसंसदSmriti Iraniस्मृती इराणी