शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:18 IST

'पंजाब सरकारने 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. केंद्र सरकारने लवकर भरपाई द्यावी.'- राहुल गांधी

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभेत काँग्रेस आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने मांडत आहे. मंगळवारी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत शहीद शेतकऱ्यांची यादी सभागृहाकडे सुपूर्द केली. यावेळी राहुल गांधींनी तीन कृषी कायद्यांविरोधात अनेक महिने चाललेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या देण्याची मागणी केली. याशिवाय राहुल गांधी यांनी ट्वटरवरुनही पंतप्रधनांवर निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांचे ट्विट-

काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, 'शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकरी शहीद झाले. पंतप्रधानांनी देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागितली. आपल्याकडून चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी.' दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनात किती शेतकरी शहीद झाले ? अशी विचारणा कृषीमंत्र्यांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सरकारकडे शेतकरी मृत्यूचा कोणताही डेटा नसल्याचे म्हटले होते.

पंजाबमध्ये सरकारने भरपाई दिली, केंद्रानेही द्यावी

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'पंजाबमधील काँग्रेस सरकारने सुमारे 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. त्यापैकी 152 शेतकऱ्यांना रोजगारही देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे आहे, जी मी सभागृहाच्या पटलावर ठेवली आहे. तिकडे हरियाणामध्येही 70 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई मिळाली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली आणि त्यांचे कृषी मंत्री म्हणतात मृतांचा रेकॉर्ड नाही. आता आम्ही यादी सभागृहात मांडली आहे, सरकारने लवकर भरपाई द्यावी', असेही राहुल म्हणाले.

काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला

यानंतर काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. राहुल गांधींनी काही मिनीटात शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली आता सरकारने नुकसान भरपाई आणि रोजगाराबाबत माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र उत्तर न मिळाल्याने काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनParliamentसंसद