शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:18 IST

'पंजाब सरकारने 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. केंद्र सरकारने लवकर भरपाई द्यावी.'- राहुल गांधी

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभेत काँग्रेस आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने मांडत आहे. मंगळवारी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत शहीद शेतकऱ्यांची यादी सभागृहाकडे सुपूर्द केली. यावेळी राहुल गांधींनी तीन कृषी कायद्यांविरोधात अनेक महिने चाललेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या देण्याची मागणी केली. याशिवाय राहुल गांधी यांनी ट्वटरवरुनही पंतप्रधनांवर निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांचे ट्विट-

काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, 'शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकरी शहीद झाले. पंतप्रधानांनी देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागितली. आपल्याकडून चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी.' दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनात किती शेतकरी शहीद झाले ? अशी विचारणा कृषीमंत्र्यांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सरकारकडे शेतकरी मृत्यूचा कोणताही डेटा नसल्याचे म्हटले होते.

पंजाबमध्ये सरकारने भरपाई दिली, केंद्रानेही द्यावी

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'पंजाबमधील काँग्रेस सरकारने सुमारे 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. त्यापैकी 152 शेतकऱ्यांना रोजगारही देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे आहे, जी मी सभागृहाच्या पटलावर ठेवली आहे. तिकडे हरियाणामध्येही 70 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई मिळाली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली आणि त्यांचे कृषी मंत्री म्हणतात मृतांचा रेकॉर्ड नाही. आता आम्ही यादी सभागृहात मांडली आहे, सरकारने लवकर भरपाई द्यावी', असेही राहुल म्हणाले.

काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला

यानंतर काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. राहुल गांधींनी काही मिनीटात शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली आता सरकारने नुकसान भरपाई आणि रोजगाराबाबत माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र उत्तर न मिळाल्याने काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनParliamentसंसद