शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:18 IST

'पंजाब सरकारने 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. केंद्र सरकारने लवकर भरपाई द्यावी.'- राहुल गांधी

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभेत काँग्रेस आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने मांडत आहे. मंगळवारी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत शहीद शेतकऱ्यांची यादी सभागृहाकडे सुपूर्द केली. यावेळी राहुल गांधींनी तीन कृषी कायद्यांविरोधात अनेक महिने चाललेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या देण्याची मागणी केली. याशिवाय राहुल गांधी यांनी ट्वटरवरुनही पंतप्रधनांवर निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांचे ट्विट-

काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, 'शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकरी शहीद झाले. पंतप्रधानांनी देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागितली. आपल्याकडून चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी.' दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनात किती शेतकरी शहीद झाले ? अशी विचारणा कृषीमंत्र्यांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सरकारकडे शेतकरी मृत्यूचा कोणताही डेटा नसल्याचे म्हटले होते.

पंजाबमध्ये सरकारने भरपाई दिली, केंद्रानेही द्यावी

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'पंजाबमधील काँग्रेस सरकारने सुमारे 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. त्यापैकी 152 शेतकऱ्यांना रोजगारही देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे आहे, जी मी सभागृहाच्या पटलावर ठेवली आहे. तिकडे हरियाणामध्येही 70 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई मिळाली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली आणि त्यांचे कृषी मंत्री म्हणतात मृतांचा रेकॉर्ड नाही. आता आम्ही यादी सभागृहात मांडली आहे, सरकारने लवकर भरपाई द्यावी', असेही राहुल म्हणाले.

काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला

यानंतर काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. राहुल गांधींनी काही मिनीटात शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली आता सरकारने नुकसान भरपाई आणि रोजगाराबाबत माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र उत्तर न मिळाल्याने काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनParliamentसंसद