शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:30 IST

केंद्राने आराेप फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन सोहळ्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनाचा कोतेपणा, तसेच विरोधकांप्रति असलेला अनादर अधोरेखित होत असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. केंद्र सरकारने मात्र काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त मान्यवरांसाठी केलेल्या आसन व्यवस्थेत राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्यात आले.

ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बाजूला राहुल यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांची आसन व्यवस्था पहिल्या रांगेत करण्यात आली होती. या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी समाजमाध्यम मंचावर यासंदर्भात टीका करताना या कृतीतून पंतप्रधानांच्या मनाचा कोतेपणा तर दिसतोच शिवाय लोकसभा निवडणुकीच्या निकालांतून त्यांनी काहीही बोध घेतला नसल्याचेही स्पष्ट होत असल्याचे म्हटले. 

  • काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. विरोधकांप्रति पंतप्रधानांना आदर नसल्याचे यातून स्पष्ट होते.
  • विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद असून, त्यांना पंतप्रधानांइतकाच मान असतो. मात्र, हे संकेत केंद्र सरकारने पायदळी तुडविल्याचे श्रीनेत म्हणाल्या. 
  • ऑलिम्पिक हिरोंना सन्मानित करण्याचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यानुसारच आसन व्यवस्था करण्यात आल्याचे सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndependence Dayस्वातंत्र्य दिन