शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
5
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
6
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
7
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
8
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
9
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
10
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
11
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
12
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
13
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
14
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
15
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
16
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
17
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
18
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
19
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
20
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:30 IST

केंद्राने आराेप फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन सोहळ्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनाचा कोतेपणा, तसेच विरोधकांप्रति असलेला अनादर अधोरेखित होत असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. केंद्र सरकारने मात्र काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त मान्यवरांसाठी केलेल्या आसन व्यवस्थेत राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्यात आले.

ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बाजूला राहुल यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांची आसन व्यवस्था पहिल्या रांगेत करण्यात आली होती. या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी समाजमाध्यम मंचावर यासंदर्भात टीका करताना या कृतीतून पंतप्रधानांच्या मनाचा कोतेपणा तर दिसतोच शिवाय लोकसभा निवडणुकीच्या निकालांतून त्यांनी काहीही बोध घेतला नसल्याचेही स्पष्ट होत असल्याचे म्हटले. 

  • काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. विरोधकांप्रति पंतप्रधानांना आदर नसल्याचे यातून स्पष्ट होते.
  • विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद असून, त्यांना पंतप्रधानांइतकाच मान असतो. मात्र, हे संकेत केंद्र सरकारने पायदळी तुडविल्याचे श्रीनेत म्हणाल्या. 
  • ऑलिम्पिक हिरोंना सन्मानित करण्याचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यानुसारच आसन व्यवस्था करण्यात आल्याचे सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndependence Dayस्वातंत्र्य दिन