शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

"...हे त्यांची दलित-मागास समाजाविरोधातील मानसिकता दर्शवते"; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 21:52 IST

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. "भाजप सरकारकडून सामाजिक न्याय सुनिश्चित करणाऱ्या संवैधानिक संस्थांमधील महत्त्वाची पदे जाणूनबुजून रिक्त ठेवणे, हे त्यांची दलित-मागास समाजाविरोधातील मानसिकता दर्शवते," असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.

यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संबंधित पत्राची कॉपी जोड राहुल गांधी यांनी म्हटले आहे, "देशभरात हजारो दलित आणि मागास लोक न्यायासाठी लढत आहेत. जातीनिहाय जनगणनेची मागणी सर्वत्र जोर धरत आहे. अशा वेळी, भाजप सरकारकडून सामाजिक न्याय सुनिश्चित करणाऱ्या संवैधानिक संस्थांमधील महत्त्वाची पदे जाणूनबुजून रिक्त ठेवणे, हे त्यांची दलित-मागास समाजाविरोधातील मानसिकता दर्शवते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील रिक्त पदे भरण्याची मागणी करत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे."

या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे, "आपल्याला हे पत्र चांगले वाटेल, अशी मला आशा आहे. मी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (एनसीएससी) आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील (एनसीबीसी) रिक्त पदांसंदर्भात लिहीत आहे. संविधानात एनसीएससी आणि एनसीबीसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची तरतूद आहे. 7व्या एनसीएससीचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती 3 मार्च, 2024 रोजी करण्यात आली होती. उपाध्यक्षाचे पद एक वर्षापासून रिक्त आहे. याशिवाय गेल्या आयोगात किमान दोन सदस्य होते. 

राहुल गांधी म्हणाले, मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी एनसीएससी आणि एनसीबीसीतील रिक्त पदे लवकरात लवकर भरावेत आणि संस्थांना त्यांचे संवैधानिक जनादेश पूर्ण करण्यासाठी सशक्त करावे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकार