शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

"...हे त्यांची दलित-मागास समाजाविरोधातील मानसिकता दर्शवते"; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 21:52 IST

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. "भाजप सरकारकडून सामाजिक न्याय सुनिश्चित करणाऱ्या संवैधानिक संस्थांमधील महत्त्वाची पदे जाणूनबुजून रिक्त ठेवणे, हे त्यांची दलित-मागास समाजाविरोधातील मानसिकता दर्शवते," असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.

यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संबंधित पत्राची कॉपी जोड राहुल गांधी यांनी म्हटले आहे, "देशभरात हजारो दलित आणि मागास लोक न्यायासाठी लढत आहेत. जातीनिहाय जनगणनेची मागणी सर्वत्र जोर धरत आहे. अशा वेळी, भाजप सरकारकडून सामाजिक न्याय सुनिश्चित करणाऱ्या संवैधानिक संस्थांमधील महत्त्वाची पदे जाणूनबुजून रिक्त ठेवणे, हे त्यांची दलित-मागास समाजाविरोधातील मानसिकता दर्शवते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील रिक्त पदे भरण्याची मागणी करत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे."

या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे, "आपल्याला हे पत्र चांगले वाटेल, अशी मला आशा आहे. मी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (एनसीएससी) आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातील (एनसीबीसी) रिक्त पदांसंदर्भात लिहीत आहे. संविधानात एनसीएससी आणि एनसीबीसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची तरतूद आहे. 7व्या एनसीएससीचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती 3 मार्च, 2024 रोजी करण्यात आली होती. उपाध्यक्षाचे पद एक वर्षापासून रिक्त आहे. याशिवाय गेल्या आयोगात किमान दोन सदस्य होते. 

राहुल गांधी म्हणाले, मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी एनसीएससी आणि एनसीबीसीतील रिक्त पदे लवकरात लवकर भरावेत आणि संस्थांना त्यांचे संवैधानिक जनादेश पूर्ण करण्यासाठी सशक्त करावे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकार