शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

सुरक्षेचे नियम न पाळल्यानेच राहुल गांधींवर हल्ला - राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:29 IST

गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे

ठळक मुद्दे'राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले''राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला'राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले

नवी दिल्ली, दि. 8 - गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राहुल गांधी यांनी शुक्रवारी गुजरातच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या कारवर एक वीट फेकली आणि काळे झेंडे दाखवण्यात आले. या हल्ल्यात राहुल यांच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे सभा लवकर आटोपून ते तेथून निघून गेले.

'तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षेचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला. त्यांनी सुरक्षेसंबिधित सूचनांचं पालन करण्याची गरज होती', असं राजनाथ सिंह लोकसभेत बोलले आहेत. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले. 'गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी सहा वेळा परदेश दौरा केला असून 72 दिवस देशाबाहेर होते. त्यांनी यावेळी एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कव्हर घेतला नाही. ते कुठे गेले होते याची आम्हाला माहिती हवी आहे ? त्यांनी एसपीजी सुरक्षा का घेतली नाही ?', असे प्रश्न राजनाथ सिंह यांनी उपस्थित केले. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी गुजरात सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. चांगली कामगिरी करत हल्ला करणा-या एका व्यक्तीला अटक केल्याप्रकरणी राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारची स्तुती केली. 

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी राहुल गांधींवर झालेल्या मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. 'काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करतात असं सरकारचं म्हणणं आहे, तर मग कोणत्या दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये दगडफेक केली ?', असा उपरोधिक प्रश्न विचारला. काँग्रेस नेत्यांनी या मुद्यावरुन गदारोळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं. 

4 ऑगस्ट रोजी राहुल गांधी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी गुजरातमध्ये होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. राहुल गांधी हल्ल्यातून सुखरुप बाहेर पडले होते. ट्विटरुन त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करत हल्ल्याचा निषेध केला होता.

याबाबत राहुल गांधी म्हणाले होते की, भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या दिशेने एक मोठा दगड मारला. तो माझ्या सुरक्षा अधिका-याला लागला. मोदी आणि आरएसएस यांची राजकारण करण्याची ही पद्धत आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाने या हल्ल्याचा निषेध केला नाही, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की,असे प्रकार करणारे स्वत:च त्याचा निषेध कसा काय करतील?