शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सुरक्षेचे नियम न पाळल्यानेच राहुल गांधींवर हल्ला - राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:29 IST

गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे

ठळक मुद्दे'राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले''राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला'राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले

नवी दिल्ली, दि. 8 - गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राहुल गांधी यांनी शुक्रवारी गुजरातच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या कारवर एक वीट फेकली आणि काळे झेंडे दाखवण्यात आले. या हल्ल्यात राहुल यांच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे सभा लवकर आटोपून ते तेथून निघून गेले.

'तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षेचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला. त्यांनी सुरक्षेसंबिधित सूचनांचं पालन करण्याची गरज होती', असं राजनाथ सिंह लोकसभेत बोलले आहेत. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले. 'गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी सहा वेळा परदेश दौरा केला असून 72 दिवस देशाबाहेर होते. त्यांनी यावेळी एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कव्हर घेतला नाही. ते कुठे गेले होते याची आम्हाला माहिती हवी आहे ? त्यांनी एसपीजी सुरक्षा का घेतली नाही ?', असे प्रश्न राजनाथ सिंह यांनी उपस्थित केले. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी गुजरात सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. चांगली कामगिरी करत हल्ला करणा-या एका व्यक्तीला अटक केल्याप्रकरणी राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारची स्तुती केली. 

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी राहुल गांधींवर झालेल्या मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. 'काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करतात असं सरकारचं म्हणणं आहे, तर मग कोणत्या दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये दगडफेक केली ?', असा उपरोधिक प्रश्न विचारला. काँग्रेस नेत्यांनी या मुद्यावरुन गदारोळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं. 

4 ऑगस्ट रोजी राहुल गांधी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी गुजरातमध्ये होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. राहुल गांधी हल्ल्यातून सुखरुप बाहेर पडले होते. ट्विटरुन त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करत हल्ल्याचा निषेध केला होता.

याबाबत राहुल गांधी म्हणाले होते की, भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या दिशेने एक मोठा दगड मारला. तो माझ्या सुरक्षा अधिका-याला लागला. मोदी आणि आरएसएस यांची राजकारण करण्याची ही पद्धत आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाने या हल्ल्याचा निषेध केला नाही, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की,असे प्रकार करणारे स्वत:च त्याचा निषेध कसा काय करतील?