शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

सुरक्षेचे नियम न पाळल्यानेच राहुल गांधींवर हल्ला - राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:29 IST

गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे

ठळक मुद्दे'राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले''राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला'राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले

नवी दिल्ली, दि. 8 - गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राहुल गांधी यांनी शुक्रवारी गुजरातच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या कारवर एक वीट फेकली आणि काळे झेंडे दाखवण्यात आले. या हल्ल्यात राहुल यांच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे सभा लवकर आटोपून ते तेथून निघून गेले.

'तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षेचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला. त्यांनी सुरक्षेसंबिधित सूचनांचं पालन करण्याची गरज होती', असं राजनाथ सिंह लोकसभेत बोलले आहेत. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले. 'गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी सहा वेळा परदेश दौरा केला असून 72 दिवस देशाबाहेर होते. त्यांनी यावेळी एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कव्हर घेतला नाही. ते कुठे गेले होते याची आम्हाला माहिती हवी आहे ? त्यांनी एसपीजी सुरक्षा का घेतली नाही ?', असे प्रश्न राजनाथ सिंह यांनी उपस्थित केले. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी गुजरात सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. चांगली कामगिरी करत हल्ला करणा-या एका व्यक्तीला अटक केल्याप्रकरणी राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारची स्तुती केली. 

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी राहुल गांधींवर झालेल्या मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. 'काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करतात असं सरकारचं म्हणणं आहे, तर मग कोणत्या दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये दगडफेक केली ?', असा उपरोधिक प्रश्न विचारला. काँग्रेस नेत्यांनी या मुद्यावरुन गदारोळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं. 

4 ऑगस्ट रोजी राहुल गांधी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी गुजरातमध्ये होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. राहुल गांधी हल्ल्यातून सुखरुप बाहेर पडले होते. ट्विटरुन त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करत हल्ल्याचा निषेध केला होता.

याबाबत राहुल गांधी म्हणाले होते की, भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या दिशेने एक मोठा दगड मारला. तो माझ्या सुरक्षा अधिका-याला लागला. मोदी आणि आरएसएस यांची राजकारण करण्याची ही पद्धत आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाने या हल्ल्याचा निषेध केला नाही, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की,असे प्रकार करणारे स्वत:च त्याचा निषेध कसा काय करतील?