शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना साथीत ४० लाख भारतीयांचा मृत्यू, राहुल गांधी यांची भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:53 IST

त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाच्या सर्वव्यापी साथीत ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला.  प्रत्येक मृतांच्या सर्व कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई देण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली.त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.मोदीजी, खरे बोलत नाहीत आणि दुसऱ्यांनाही बोलू देत नाहीत.  ऑक्सिजनच्या तुटवड्याने एकाचाही मृत्यू झाला नाही, असे ते आजही खोटे बोलत आहेत, असा आरोप  त्यांनी हिंदीतील ट्वीटमध्ये केला आहे. मी आधीही म्हणालो होतो की, कोविडच्या काळात सरकारच्या निष्काळजीपणाने पाच लाख नाही, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला.  जबाबदारी पार पाडा, मोदीजी, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. कोविड-१९ मृत्युदराचे  आकलन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीवर भारताने शनिवारी प्रश्न उपस्थित करताना  म्हटले होते की,  विशाल भौगोलिक आकार आणि लोकसंख्या असलेल्या देशांत कोविड मृतांच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी अशी गणितीय पद्धत लागू केली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या