शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना साथीत ४० लाख भारतीयांचा मृत्यू, राहुल गांधी यांची भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:53 IST

त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाच्या सर्वव्यापी साथीत ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला.  प्रत्येक मृतांच्या सर्व कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई देण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली.त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.मोदीजी, खरे बोलत नाहीत आणि दुसऱ्यांनाही बोलू देत नाहीत.  ऑक्सिजनच्या तुटवड्याने एकाचाही मृत्यू झाला नाही, असे ते आजही खोटे बोलत आहेत, असा आरोप  त्यांनी हिंदीतील ट्वीटमध्ये केला आहे. मी आधीही म्हणालो होतो की, कोविडच्या काळात सरकारच्या निष्काळजीपणाने पाच लाख नाही, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला.  जबाबदारी पार पाडा, मोदीजी, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. कोविड-१९ मृत्युदराचे  आकलन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीवर भारताने शनिवारी प्रश्न उपस्थित करताना  म्हटले होते की,  विशाल भौगोलिक आकार आणि लोकसंख्या असलेल्या देशांत कोविड मृतांच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी अशी गणितीय पद्धत लागू केली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या