शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"आई, मी हँडसम दिसतो का?", राहुल गांधींनी सांगितला बालपणीचा रंजक किस्सा; सोनियांचं उत्तर होतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:57 IST

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील टप्प्याचा कालचा शेवटचा दिवस होता.

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील टप्प्याचा कालचा शेवटचा दिवस होता. आता राहुल गांधी 'भारत जोडो'च्या पुढच्या प्रवासाला रवाना झाले आहेत. या यात्रेचा राजकीय फायदा दिसून येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल आणि लोकांचं मतपरिवर्तन नक्की होईल असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात एका यूट्यूबरशी साधताना त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. राहुल यांनी एकदा आईला म्हणजेच सोनिया गांधी यांना मी हँडसम दिसतो का? असं विचारलं होतं. त्यावर सोनियांनी...नाही, ठीकठाक दिसतोस असं प्रांजळ मत दिलं होतं. 

महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी यूट्यूबर समदीश भाटिया याला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला. "मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी आईजवळ जाऊन विचारायचो की मी हँडसम दिसतो का? तेव्हा आईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं की नाही. तू ठिकठाक दिसतोस. माझी आई अशीच आहे. ती तुम्हाला लगेच आरसाच दाखवते. माझे वडीलही असेच होते. माझं संपूर्ण कुटूंब असंच आहे. तुम्ही जर काही सांगू इच्छित असाल तर तुम्हाला थेट सत्याचा सामना करुन दिला जातो. खोटी स्तुती करणं माझ्या कुटुंबीयांना कधीच जमत नाही", असं राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधींचे शूज कोण खरेदी करतं?आपल्या लाइफस्टाइलबाबत बोलत असताना राहुल गांधींच्या शूज बाबतही विचारलं गेलं. तुम्ही तुमचे शूज स्वत:च खरेदी करता का? असं विचारलं असता राहुल यांनी कधी-कधी त्यांची आई किंवा बहिण शूज पाठवते असं म्हटलं. तर काही नेते मित्रमंडळी शूज भेट म्हणून देत असल्याचंही सांगितलं. भाजपामधून कुणी तुम्हाला कधी शूज पाठवलेत का? असं विचारलं असता राहुल यांनी मिश्किलपणे ते तर माझ्यावर बुट फेकतात, असं म्हटलं. 

भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?

महाराष्ट्रातील टप्पा संपलाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याच्या समारोपप्रसंगी त्यांचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता असं म्हटलं. तसंच महाराष्ट्रानं आपल्याला प्रेम आणि विश्वास दिला, याचे आभारही व्यक्त केले. राहुल गांधींनी मोदी सरकारवर पंचायत आणि अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा (PESA कायदा), वन हक्क कायदा, जमीन हक्क, पंचायत राज कायदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण यासारखे कायदे सौम्य केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यावर हे कायदे आणखी मजबूत केले जातील.

२३ नोव्हेंबरपासून यात्रेचा मध्य प्रदेशातील टप्पा सुरू होणार२१ आणि २२ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात थांबून २३ नोव्हेंबरला मध्य प्रदेशच्या दिशेने प्रयाण करेल. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, महिला, तरुण आणि शेतकरी या यात्रेत प्रमुख सहभागी आहेत. या यात्रेने प्रेरणादायी संदेश दिला असून नवी काँग्रेस उदयास येत असल्याचा दावा त्यांनी केला. यात्रेसाठी उत्तम व्यवस्था केल्याबद्दल रमेश यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटच्या नेतृत्वाचे आभार मानले. यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी यात्रेअंतर्गत राज्यात ३८० किलोमीटरहून अधिक अंतर कापण्यात आल्याची माहिती दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा