शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राहुल गांधींचा भाजपावर हल्ला; त्यांच्या लेखी नरेंद्र मोदी, अमित शहा हीच माणसे, बाकी सारी जनावरेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 06:16 IST

भाजपाच्या लेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा हीच दोन माणसे आहेत व बाकी सर्व जनावरे आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

बंगळुरू: भाजपाच्या लेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा हीच दोन माणसे आहेत व बाकी सर्व जनावरे आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. भाजपावाल्यांना स्वपक्षीयांविषयी बोलण्याची हिंमत नाही, म्हणून ते विरोधकांवर असा राग काढतात, असा टोला त्यांनी लगावला.स्थापना दिनानिमित्त मुंबईतील मेळाव्यात अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘साप’, ‘मुंगूस’ ‘कुत्रे’ आणि ‘मांजर’ असे संबोधून कधीही एकत्र न येणारे हे सर्व प्राणी मोदींच्या विरोधात एकत्र येण्याची भाषा करत आहेत, असे म्हटले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत, राहुल गांधी म्हणाले की, शहा यांच्या या भाषेवरून भाजपा आणि रा. स्व. संघाचा दृष्टीकोन काय आहे, हेच स्पष्ट होते. त्यांचे हे वक्तव्य अनादरकारक असले, तरी शहा यांचे हे वक्तव्य कोणीच गांभीर्याने घेत नाही. (वृत्तसंस्था)स्वपक्षीयांचीही किंमत नाहीते म्हणाले की, खरं तर भाजपाच्या लेखी इतर कोणालाच किंमत नाही. त्यांच्या मते ज्यांना किंमत आहे व ज्यांना सर्व काही समजते अशा दोन-तीनच व्यक्ती आहेत, बाकी सर्वजण क्षुल्लक आहेत. त्यांचे हे इतरांना कमी लेखणे दलित, अल्पसंख्य आणि आदिवासींपुरतेच मर्यादित नाही. आडवाणी, मुरली मनोहर जोशी व अगदी नितिन गडकरी या स्वपक्षीयांचीही त्यांना किंमत नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी