शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:01 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबियांच्या दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केला.

Rahul Gandhi on Agniveer Scheme : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अग्निवीर योजनेवरुन सरकारला घेरलं आहे. अग्नीवीरांना योग्य भरपाई मिळत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर संसदेत मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर सरकारने स्पष्टीकरण आणि भारतीय सैन्याने पुरावे दिले होते. मात्र त्यानंतरही आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. शहीद कुटुंबाला आजपर्यंत भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला आणि मोदी सरकार अग्निवीर जवानांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला.

पंजाबचे शहीद अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला सरकारने कोणतीही भरपाई दिली नसून कुटुंबाला फक्त विम्याची रक्कम मिळाली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत सरकारवर निशाणा साधला. शहीद अग्निवीर अजय कुमार जी यांच्या कुटुंबाला आजपर्यंत सरकारकडून कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. तसेच नुकसानभरपाई आणि विमा यात फरक असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं.

अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा वाद शुक्रवारी तीव्र झाला. राहुल गांधी यांनी शहीद अजय कुमारच्या कुटुंबाला आजपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार केला आणि मोदी सरकार अग्निवीर यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी त्यांच्या एक्सपोस्टसोबत व्हिडीओ जारी करत सरकारवर टीका केली.

"शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती अद्याप मिळालेली नाही. 'भरपाई' आणि 'विमा' यात फरक आहे. हुतात्माच्या कुटुंबाला विमा कंपनीनेच पैसे दिले आहेत. शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती मिळालेली नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहिदाच्या कुटुंबाचा सन्मान व्हायला हवा पण मोदी सरकार त्यांच्याशी भेदभाव करत आहे. सरकार काहीही म्हणेल पण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे आणि मी तो मांडतच राहीन. इंडिया आघाडी सैन्याला कधीही कमकुवत होऊ देणार नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर कर्तव्यादरम्यान आपला जीव गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला भरपाई दिली गेली नसल्याचा दावा लष्कराने फेटाळला होता. या कुटुंबाला देय रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये आधीच देण्यात आल्याचे लष्कराने सांगितले होते. "भरपाईची एकूण रक्कम सुमारे १.६५ कोटी रुपये असेल. अग्निवीर योजनेच्या नियमानुसार पोलीस पडताळणीनंतर ६७ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे," असे भारतीय लष्कराने स्पष्टीकरणात म्हटलं होतं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान