शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:01 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबियांच्या दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केला.

Rahul Gandhi on Agniveer Scheme : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अग्निवीर योजनेवरुन सरकारला घेरलं आहे. अग्नीवीरांना योग्य भरपाई मिळत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर संसदेत मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर सरकारने स्पष्टीकरण आणि भारतीय सैन्याने पुरावे दिले होते. मात्र त्यानंतरही आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. शहीद कुटुंबाला आजपर्यंत भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला आणि मोदी सरकार अग्निवीर जवानांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला.

पंजाबचे शहीद अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला सरकारने कोणतीही भरपाई दिली नसून कुटुंबाला फक्त विम्याची रक्कम मिळाली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत सरकारवर निशाणा साधला. शहीद अग्निवीर अजय कुमार जी यांच्या कुटुंबाला आजपर्यंत सरकारकडून कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. तसेच नुकसानभरपाई आणि विमा यात फरक असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं.

अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा वाद शुक्रवारी तीव्र झाला. राहुल गांधी यांनी शहीद अजय कुमारच्या कुटुंबाला आजपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार केला आणि मोदी सरकार अग्निवीर यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी त्यांच्या एक्सपोस्टसोबत व्हिडीओ जारी करत सरकारवर टीका केली.

"शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती अद्याप मिळालेली नाही. 'भरपाई' आणि 'विमा' यात फरक आहे. हुतात्माच्या कुटुंबाला विमा कंपनीनेच पैसे दिले आहेत. शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती मिळालेली नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहिदाच्या कुटुंबाचा सन्मान व्हायला हवा पण मोदी सरकार त्यांच्याशी भेदभाव करत आहे. सरकार काहीही म्हणेल पण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे आणि मी तो मांडतच राहीन. इंडिया आघाडी सैन्याला कधीही कमकुवत होऊ देणार नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर कर्तव्यादरम्यान आपला जीव गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला भरपाई दिली गेली नसल्याचा दावा लष्कराने फेटाळला होता. या कुटुंबाला देय रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये आधीच देण्यात आल्याचे लष्कराने सांगितले होते. "भरपाईची एकूण रक्कम सुमारे १.६५ कोटी रुपये असेल. अग्निवीर योजनेच्या नियमानुसार पोलीस पडताळणीनंतर ६७ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे," असे भारतीय लष्कराने स्पष्टीकरणात म्हटलं होतं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान