शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:01 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबियांच्या दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केला.

Rahul Gandhi on Agniveer Scheme : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अग्निवीर योजनेवरुन सरकारला घेरलं आहे. अग्नीवीरांना योग्य भरपाई मिळत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर संसदेत मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर सरकारने स्पष्टीकरण आणि भारतीय सैन्याने पुरावे दिले होते. मात्र त्यानंतरही आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. शहीद कुटुंबाला आजपर्यंत भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला आणि मोदी सरकार अग्निवीर जवानांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला.

पंजाबचे शहीद अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला सरकारने कोणतीही भरपाई दिली नसून कुटुंबाला फक्त विम्याची रक्कम मिळाली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत सरकारवर निशाणा साधला. शहीद अग्निवीर अजय कुमार जी यांच्या कुटुंबाला आजपर्यंत सरकारकडून कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. तसेच नुकसानभरपाई आणि विमा यात फरक असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं.

अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा वाद शुक्रवारी तीव्र झाला. राहुल गांधी यांनी शहीद अजय कुमारच्या कुटुंबाला आजपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार केला आणि मोदी सरकार अग्निवीर यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी त्यांच्या एक्सपोस्टसोबत व्हिडीओ जारी करत सरकारवर टीका केली.

"शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती अद्याप मिळालेली नाही. 'भरपाई' आणि 'विमा' यात फरक आहे. हुतात्माच्या कुटुंबाला विमा कंपनीनेच पैसे दिले आहेत. शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती मिळालेली नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहिदाच्या कुटुंबाचा सन्मान व्हायला हवा पण मोदी सरकार त्यांच्याशी भेदभाव करत आहे. सरकार काहीही म्हणेल पण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे आणि मी तो मांडतच राहीन. इंडिया आघाडी सैन्याला कधीही कमकुवत होऊ देणार नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर कर्तव्यादरम्यान आपला जीव गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला भरपाई दिली गेली नसल्याचा दावा लष्कराने फेटाळला होता. या कुटुंबाला देय रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये आधीच देण्यात आल्याचे लष्कराने सांगितले होते. "भरपाईची एकूण रक्कम सुमारे १.६५ कोटी रुपये असेल. अग्निवीर योजनेच्या नियमानुसार पोलीस पडताळणीनंतर ६७ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे," असे भारतीय लष्कराने स्पष्टीकरणात म्हटलं होतं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान