शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल गांधी, तुम्ही संयमाने बोला! लोकसभाध्यक्षांना असे का म्हणावे लागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:41 IST

लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रातील सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची, देशाची, हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशभक्त नाही, देशद्रोही आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षणकर्ते नाही तर भारतमातेचे हत्यारे आहात. तुम्ही मणिपूरपाठोपाठ हरयाणात आणि संपूर्ण देशात केरोसिन शिंपडत असून साऱ्या देशाला जाळण्यात गुंतलेले आहात, असा जोरदार हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला.    

लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली आणि नंतर अतिशय आक्रमक आवेशात मणिपूरवरील केंद्र सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. 

भारत हा आमच्या जनतेच्या हृदयाचा आवाज आहे; पण मणिपूरच्या लोकांना जिवे मारून तुम्ही भारताची हत्या केली आहे. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळलेराहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थानच्या हृदयाचा आवाज ऐकत नसतील तर ते कोणाचा आवाज ऐकतात? ते दोनच लोकांचा आवाज ऐकतात. रावण दोनच लोकांचे ऐकायचा. मेघनाद आणि कुंभकर्णाचे. तसेच, नरेंद्र मोदी दोन लोकांचेच ऐकतात. अमित शाह आणि अदानींचे. लंकेला हनुमानाने नाही जाळले. लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळले, असे राहुल गांधी म्हणाले. रामाने रावणाला मारले नाही. रावणाला त्याच्या अहंकाराने मारले, असे राहुल गांधी म्हणाले. त्यावर हे सभागृह आहे. तुम्ही संयमाने बोला, असे आवाहन अध्यक्ष बिर्ला यांनी राहुल गांधी यांना केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन