शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा होकार की नकार? भूमिकेकडे लक्ष, काँग्रेसमध्ये विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 06:09 IST

राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, ही बहुतांश नेते व कार्यकर्त्यांची भावना आहे. तसे न झाल्यास सोनिया गांधी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असतानाच राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे स्वीकारण्यास तयार झाले नाहीत तर कोणता पर्याय असेल, याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी नकार दिला तर गांधी परिवारातील एखाद्या विश्वासपात्र नेत्याकडे सूत्रे द्यावीत किंवा पुन्हा एकदा सोनिया गांधी यांनीच पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी, याबाबत पक्षात विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया २१ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे व २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता व त्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुका पाहता राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे; परंतु राहुल यांच्याकडून होकाराची प्रतीक्षा आहे.

काँग्रेसच्या अन्य एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी अध्यक्ष न झाल्यास सोनिया गांधी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहतील व दोन-तीन वरिष्ठ नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

निवडणुकीची दिशा राहुल यांच्यावर अवलंबून

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, ही बहुतांश नेते व कार्यकर्त्यांची भावना आहे, यात कोणतेही दुमत नाही; परंतु यासाठी ते स्वत: तयार असणे गरजेचे आहे. राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याचे माझ्या माहितीनुसार तरी अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. अनेक वेळा पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह केलेला आहे; परंतु त्यांच्याकडून होकार मिळालेला नाही. आता या निवडणुकीची दिशा त्यांच्या होकार किंवा नकारावर अवलंबून आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी