शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

पाकिस्तान, चीनवर भारताचा राफेल वचक

By admin | Updated: September 24, 2016 05:48 IST

भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल विमानांचा करार अखेर झाला

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल विमानांचा करार अखेर झाला आहे. ही राफेल विमाने भारतात दाखल झाल्याने सारख्या कुरबोरी काढणाऱ्या पाकिस्तान आणि चीनवर भारताला आणखी वचक ठेवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यात त्या देशाकडून ३६ राफेल विमाने घेण्याची घोषणा केली होती. त्याबाबत गेल्याच आठवड्यात दोन्ही देशांमध्ये शिक्कामोर्तब झाले आणि पंतप्रधानांच्या घोषणेनंतर १६ महिन्यांत करारावर सह्या झाल्या आहेत. गेल्या २0 वर्षांतील हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय करार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राफेलशी करण्यात आलेला करार मोदी सरकारने रद्द केला होता. यूपीएच्या काळातील कराराच्या तुलनेत नव्या करारामुळे भारताचे ७५ कोटी युरो म्हणजेच भारतीय चलनातील ५६0१ कोटी रुपये वाचणार आहेत, असे सांगण्यात आले. >36लढाऊ विमानांसाठी फ्रान्ससोबत करार>59,000 कोटींचा करारया करारामुळे येत्या तीन वर्षांनी भारतीय हवाई दलामध्ये राफेल विमाने दाखल होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतरच्या दोन ते तीन वर्षांत सर्व ३६ विमाने भारताकडे आलेली असतील. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद अजून वाढणार असून, त्यामुळे चीनवर वचक ठेवण्यास उपयोग होईल, असे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.>काय होईल या विमानांमुळे?या विमानांमुळे हवाई दलाला भारताच्या हद्दीबाहेर न जाताही पाकिस्तानवर निशाणा साधणे शक्य होऊ शकेल. या विमानात मिटीअर आणि मायका या दोन क्षेपणास्त्र प्रणाली असतील. पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा राफेल विमानांतील प्रणाली अधिक संहारक असल्याची माहिती देण्यात आली. या विमानांची हवेतील क्षेपणास्त्र क्षमता १५0 किलोमीटर असेल.