शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

भांडवलदारांच्या फायद्यासाठीच राफेल करार; राहुल गांधींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:10 IST

नवी दिल्ली : लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा खरेदी करार पुन्हा करण्यात आला आणि जगात भारताची प्रतिष्ठा कमी ...

नवी दिल्ली : लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा खरेदी करार पुन्हा करण्यात आला आणि जगात भारताची प्रतिष्ठा कमी झाली, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर हल्ला केला.

फेसबुक पोस्टवर गांधी यांनी म्हटले आहे की, करारासाठी वाटाघाटी पुन्हा करण्यात आल्यामुळे भारताला तंत्रज्ञान हस्तांतर होऊ शकणार नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण ठरले होते. नवे तंत्रज्ञान भारतात येऊ न शकल्यामुळे पुरातन जग्वार विमाने चालवताना भारतीय विमानचालकांचे जीवित धोक्यात आले आहे ही लाजिरवाणी बाब आहे. १२६ राफेल विमानांसोबत तंत्रज्ञान मिळवण्याऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने फ्रान्समध्ये बनवलेल्या ३६ विमानांचा खरेदी व्यवहार केला, असा आरोप राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तांच्या आधारे केला. १२६ राफेल विमाने तंत्रज्ञानासह आली असती तर भारतीय हवाई दलात मोठे परिवर्तन घडले असते, असेही गांधी म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने वाटाघाटी केलेल्या व्यवहारांना पूर्ण करण्याऐवजी २०१४ पासून मोदी सरकार लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी फेरवाटाघाटी करीत आहे, असे गांधी म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने १२६ राफेल विमानांसाठी केलेल्या करारामुळे भारतीय हवाई दलाचा चेहरा बदलला असता....तर स्वावलंबी झालो असतोआधीच्या करारात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचाही समावेश होता. तंत्रज्ञानामुळे भविष्यात आम्ही स्वावलंबी व्हायला मदत झाली असती. हे न करता अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी खरेदी व्यवहार पुन्हा केला व फक्त ३६ विमानेच येणार आहेत व ती यायलाही कित्येक वर्षे लागतील, असे या पोस्टमध्ये गांधी यांनी म्हटले.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील