शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पंचवीस वर्षात शहराचा विकास झाला नाही राधाकृष्ण विखे पाटील: श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

अहमदनगर: गत पंचवीस वर्षात शहराचा विकास न झाल्याने शहर विकासापासून पन्नास वर्षे मागे गेले आहे. पंचवीस वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व करणार्‍यांना शहर विकास करण्याची इच्छाशक्तीच नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नगरकरांना पंचवीस वर्षात आमदार निधी कसा अन् काय असतो हे कळाले नाही. शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी बदलल्यानंतर त्यांना आमदार निधी कळाला असल्याचे सांगत त्यांनी आमदार जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले.

अहमदनगर: गत पंचवीस वर्षात शहराचा विकास न झाल्याने शहर विकासापासून पन्नास वर्षे मागे गेले आहे. पंचवीस वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व करणार्‍यांना शहर विकास करण्याची इच्छाशक्तीच नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नगरकरांना पंचवीस वर्षात आमदार निधी कसा अन् काय असतो हे कळाले नाही. शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी बदलल्यानंतर त्यांना आमदार निधी कळाला असल्याचे सांगत त्यांनी आमदार जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले.
आमदार अरुण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून माजी नगरसेवक निखील वारे, नगरसेविका रुपाली वारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग दोनमधील मच्छिंद्र हौसिंग सोसायटीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, निखील वारे, रुपाली वारे, जयश्री सोनवणे, फैय्याज शेख, समदखान, बाळासाहेब पवार, बाबुशेट टायरवाले, सुनील कोतकर, सुवालाल गुंदेचा, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, सुनीता कांबळे, सविता कराळे, सविता मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, पंचवीस वर्षे शहराचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नेत्यात विकास करण्याची इच्छाशक्तीच नव्हती. ग्रामीण भागातील नागरिक शहरात स्थलांतरित होत असल्याने शहराचे विस्तारीकरण वाढत आहे. नगरपालिकांची महापालिका होते, पण महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही. शहर व ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आाहेत. समाजातील विषमता दूर कधी होईल माहिती नाही, पण वैचारिक विषमता दूर होणे गरजेचे आहे. तरच शहराची प्रगती होते. आमदार जगताप यांनी शहराला वायफाय शहर करण्याचा संकल्प करावा असे सुचवित तंत्रज्ञान लोकांच्या दाराशी पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासाचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगत उपनगराच्या विकासावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. उद्यानाच्या कामात अनेकांनी खोडा घातला पण वारे यांच्या पाठपुराव्यामुळे हे उद्यान साकारू शकले असे संग्राम जगताप यांनी सांगितले. उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी या उद्यानात महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक केल्यामुळे नगरसेविका रुपाली वारे यांचे अभिनंदन केले. प्रास्तविक निखील वारे यांनी तर रुपाली वारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
....
फोटो आहे.