शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

सरकार आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:40 IST

निझामुद्दीमन मरकजमधील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याची भिती आरोग्य मंत्रालयास आहे.

नवी दिल्ली : निझामुद्दीम तबलिकी मरकजमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाल्यानंतर देशभर पसरले. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या त्यामुळे गेल्या दोन दिवसांत झपाट्याने वाढली आहे. परदेशातून या कार्यक्रमात येणाऱ्यांना व्हिसा देणे, इतक्या मोठ्या जमावाला परवानगी देणे व लॉकडाऊन झाल्यानंतरही हा परिसर रिकामा न करणे - यामुळे परराष्ट्र मंत्रालय, राज्य सरकार व दिल्ली पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

निझामुद्दीमन मरकजमधील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याची भिती आरोग्य मंत्रालयास आहे. शिवाय असंख्य लोकांनी प्रवासही केल्याने इतर राज्यांनाही धोका वाढला आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती देशात असताना मरकजमध्ये जमलेल्यांना क्वारंटाईन करण्यास विलंब झाल्याची कबुली आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

फेब्रुवारीपासून भारतात आलेल्या देशी-विदेशी नागरिकास १४ दिवस सक्तीचे क्वारंटाईन करण्यात आले. मात्र मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले नाही. शिवाय खोलीत आठ ते दहा जण राहत होते. ही बाबदेखील गृह विभागाच्या अखत्यारित येणाºया दिल्ली पोलिसांकडून सुटली. कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा कार्यक्रम तात्काळ रोखण्याची, सहभागी झालेल्यांची चाचणी करण्याची जबाबदारी कुणाची यावरही वाद सुरू झाला आहे.

संपूर्ण देशभर कोरोनाचा शिरकाव झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोनावर बºयापैकी नियंत्रण राखण्यात सरकारला यश आले. रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आयसीएमआरने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार भारताने अद्याप कोविड १९ चाचणीसाठी ३८ टक्केच क्षमता वापरली आहे. आता मात्र सर्व संसाधने, चाचणीची क्षमता पूर्ण वापरावी लागेल, असा अंदाज आयसीएमआरमधील सूत्रांनी वर्तवला.

14 दिवस क्वारंटाईन

इंडोनेशिया, बांगलादेशासह आशियाई देशातून तबलिकी जमातचे लोक आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते दिल्लीत दाखल झाल्याने तेव्हाच त्यांना क्वारंटाईन करण्याचा आदेश परराष्ट्र मंत्रालयाने का दिला नाही, यावरूनही सरकारमध्ये चर्चा रंगली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली