शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सरकार आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:40 IST

निझामुद्दीमन मरकजमधील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याची भिती आरोग्य मंत्रालयास आहे.

नवी दिल्ली : निझामुद्दीम तबलिकी मरकजमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाल्यानंतर देशभर पसरले. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या त्यामुळे गेल्या दोन दिवसांत झपाट्याने वाढली आहे. परदेशातून या कार्यक्रमात येणाऱ्यांना व्हिसा देणे, इतक्या मोठ्या जमावाला परवानगी देणे व लॉकडाऊन झाल्यानंतरही हा परिसर रिकामा न करणे - यामुळे परराष्ट्र मंत्रालय, राज्य सरकार व दिल्ली पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

निझामुद्दीमन मरकजमधील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याची भिती आरोग्य मंत्रालयास आहे. शिवाय असंख्य लोकांनी प्रवासही केल्याने इतर राज्यांनाही धोका वाढला आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती देशात असताना मरकजमध्ये जमलेल्यांना क्वारंटाईन करण्यास विलंब झाल्याची कबुली आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

फेब्रुवारीपासून भारतात आलेल्या देशी-विदेशी नागरिकास १४ दिवस सक्तीचे क्वारंटाईन करण्यात आले. मात्र मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले नाही. शिवाय खोलीत आठ ते दहा जण राहत होते. ही बाबदेखील गृह विभागाच्या अखत्यारित येणाºया दिल्ली पोलिसांकडून सुटली. कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा कार्यक्रम तात्काळ रोखण्याची, सहभागी झालेल्यांची चाचणी करण्याची जबाबदारी कुणाची यावरही वाद सुरू झाला आहे.

संपूर्ण देशभर कोरोनाचा शिरकाव झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोनावर बºयापैकी नियंत्रण राखण्यात सरकारला यश आले. रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आयसीएमआरने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार भारताने अद्याप कोविड १९ चाचणीसाठी ३८ टक्केच क्षमता वापरली आहे. आता मात्र सर्व संसाधने, चाचणीची क्षमता पूर्ण वापरावी लागेल, असा अंदाज आयसीएमआरमधील सूत्रांनी वर्तवला.

14 दिवस क्वारंटाईन

इंडोनेशिया, बांगलादेशासह आशियाई देशातून तबलिकी जमातचे लोक आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते दिल्लीत दाखल झाल्याने तेव्हाच त्यांना क्वारंटाईन करण्याचा आदेश परराष्ट्र मंत्रालयाने का दिला नाही, यावरूनही सरकारमध्ये चर्चा रंगली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली