शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

इतरांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला कशामुळे?, विद्यार्थ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:02 IST

सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्या विष

नवी दिल्ली : सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्या विषयांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. पेपरफुटीला आम्ही दोषी नाही, आम्ही वर्षभर अभ्यास करून परीक्षा दिली. मग काहींच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल ते करीत आहेत.या परीक्षेसाठी तारखांची घोषणा सोमवारी वा मंगळवारी होऊ शकते, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पेपरफुटीप्रकरणी कोचिंग क्लासवर संशय असून, विकी या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य २५ जणांची चौकशी सुरू आहे.काही विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी सकाळी त्यांना लिफाफा मिळाला. त्यात बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरचे उत्तर होते. पोलिसांनी बारावी अर्थशास्त्र व दहावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसात दिलेल्या तक्रारीत बोर्डाने म्हटले आहे की, त्यांना २३ मार्च रोजी अज्ञात ठिकाणाहून एक फॅक्स आला. राजेंद्रनगरमध्ये कोचिंग क्लास चालविणारी एक व्यक्ती पेपरफुटीत सहभागी आहे, असे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीत दोन शाळांची नावेही होती. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. ‘आमच्या आयुष्याशी खेळू नका’ असे फलक ते झळकावत होते. या विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की, जवळपास सर्वच पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी फुटले होते. त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यायची असल्यास सर्वच विषयांची घ्यावी. काही विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, दोन विषयांची पुन्हा परीक्षा घेण्याच्या घोषणेमुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत.मीही शांतपणे झोपू शकत नाही !पेपरफुटी प्रकरणात दोषींना सोडणार नाही, असे सांगतानाच मीही पालक आहे आणि असे घडल्याने निश्चिंत झोपू शकत नाही, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर गुरुवारी म्हणाले. या घटनेने सीबीएसईच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून परीक्षा व्यवस्थेत बदलासह सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीमुळे ती परीक्षा पुन्हा होणार आहे. पालकांचा त्रास मी समजू शकतो. विद्यार्थ्यांची काय अवस्था होते याची मला जाणीव आहे, असेही त्यांनी सांगितले.त्याच राज्यात होणार परीक्षा?ज्या राज्यात प्रश्नपत्रिका लीक झाली त्याच राज्यात पुन्हा परिक्षा घेण्याचा विचार सध्या सुरू आहे. जर १० वी गणिताची परिक्षा पूर्ण देशात झाली तर, १६.३८ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परिक्षा द्यावी लागेल. पण, कमी विद्यार्थ्यांची जर पुन्हा परीक्षा झाली तर, याचे निकालही वेळेवर लागतील.

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा