शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय समितीला प्रश्न

By admin | Updated: March 27, 2017 01:25 IST

निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की सरकारचा थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या या आयोगाने गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजनांचे काय झाले हे काही समोर येत नाही.स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की आयोगाच्या अनेक योजना त्यांना दिल्या गेलेल्या निधीचा वापर करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अर्थ मंत्रालयाकडून स्टार्ट अप आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चालवल्या जात असलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि स्व-रोजगार व प्रतिभा उपयोगितेचा हवाला देऊन समितीने म्हटले आहे की त्यांच्यासाठी अनुक्रमे १५० व १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सुधारीत अंदाजामध्ये त्यात वाढ करण्यात आली परंतु स्पष्ट आदेश आणि सगळ््या पक्षांच्या सल्ल्याअभावी हा निधी खर्च केला गेला नाही. खूपच कमी पैसा खर्च केल्यामुळे एक चांगली योजना अपयशी ठरली.परिणामांचा विचार करून योजना तयार कराव्यातकाँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली अध्यक्ष असलेल्या या समितीने म्हटले आहे की योजना आयोगाची जागा घेतलेल्या निती आयोगाने परिणामांचा विचार करून योजना तयार करायला हव्यात. त्याचबरोबर सरकारला आयोगाची भूमिका स्पष्ट आणि कार्यप्रणालीला सरळ बनवायची सूचना केली. आयोगाची भूमिका आता पूर्वीच्या नियोजन आयोगासारखी राहिलेली नाही तर निव्वळ सरकारचा थिंक टँकच्या रुपात काम करताना धोरण बनवण्यात मदत केली पाहिजे. आयोगाने राज्यांराज्यांत होणाऱ्या पाणी वाटपावरील वादांना सोडवण्याचेही काम करावे असा सल्ला दिला. समितीने आयोगाच्या रचनेला अधिक व्यावहारिक करण्याचीही शिफारस करून त्यामुळे त्याला जास्त प्रभावीपणे काम करता येईल, असे म्हटले.