शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय समितीला प्रश्न

By admin | Updated: March 27, 2017 01:25 IST

निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की सरकारचा थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या या आयोगाने गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजनांचे काय झाले हे काही समोर येत नाही.स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की आयोगाच्या अनेक योजना त्यांना दिल्या गेलेल्या निधीचा वापर करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अर्थ मंत्रालयाकडून स्टार्ट अप आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चालवल्या जात असलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि स्व-रोजगार व प्रतिभा उपयोगितेचा हवाला देऊन समितीने म्हटले आहे की त्यांच्यासाठी अनुक्रमे १५० व १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सुधारीत अंदाजामध्ये त्यात वाढ करण्यात आली परंतु स्पष्ट आदेश आणि सगळ््या पक्षांच्या सल्ल्याअभावी हा निधी खर्च केला गेला नाही. खूपच कमी पैसा खर्च केल्यामुळे एक चांगली योजना अपयशी ठरली.परिणामांचा विचार करून योजना तयार कराव्यातकाँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली अध्यक्ष असलेल्या या समितीने म्हटले आहे की योजना आयोगाची जागा घेतलेल्या निती आयोगाने परिणामांचा विचार करून योजना तयार करायला हव्यात. त्याचबरोबर सरकारला आयोगाची भूमिका स्पष्ट आणि कार्यप्रणालीला सरळ बनवायची सूचना केली. आयोगाची भूमिका आता पूर्वीच्या नियोजन आयोगासारखी राहिलेली नाही तर निव्वळ सरकारचा थिंक टँकच्या रुपात काम करताना धोरण बनवण्यात मदत केली पाहिजे. आयोगाने राज्यांराज्यांत होणाऱ्या पाणी वाटपावरील वादांना सोडवण्याचेही काम करावे असा सल्ला दिला. समितीने आयोगाच्या रचनेला अधिक व्यावहारिक करण्याचीही शिफारस करून त्यामुळे त्याला जास्त प्रभावीपणे काम करता येईल, असे म्हटले.