शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

देशात सीबीआय-ईडीसारख्या यंत्रणा स्वतंत्र आहेत का? UPSC टॉपरनं दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:42 IST

UPSC परीक्षेच्या अंतिम मुलाखतीमधील प्रश्नांबद्दल आपण ऐकलंच असेल. या प्रश्नांना इंटेलिजेंट उत्तर देऊनच उमेदवाराला यश मिळतं.

ठळक मुद्देया परीक्षेतील प्रश्नांबद्दल, मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यंदा युपीएससी परीक्षेत चौथी रँक घेऊन उत्तीर्ण झालेल्या यश झुलका यांनी आपला मुलाखतीमधील एक अनुभव शेअर केला आहे. 

नवी दिल्ली - नुकतेच युपीएससी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, महाराष्ट्राती 100 पेक्षा अधिक युवक-युवतींनी यश मिळवत देशात महाराष्ट्राची पताका फडकवली. या परीक्षेबद्दल अनेकांच्या मनात भीती असते, ही परीक्षा अतिशय अवघड असून देशातभरातून केवळ 700 ते 800 च विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत उत्तीर्ण होतात. त्यामुळे, या परीक्षेतील प्रश्नांबद्दल, मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यंदा युपीएससी परीक्षेत चौथी रँक घेऊन उत्तीर्ण झालेल्या यश झुलका यांनी आपला मुलाखतीमधील एक अनुभव शेअर केला आहे. 

UPSC परीक्षेच्या अंतिम मुलाखतीमधील प्रश्नांबद्दल आपण ऐकलंच असेल. या प्रश्नांना इंटेलिजेंट उत्तर देऊनच उमेदवाराला यश मिळतं. या परीक्षेत देशात 4 थ्या क्रमांकावर यश मिळवणाऱ्या झारखंडच्या यश झुलक यांसही असाच एक अटीतटीचा प्रश्न विचारण्यात आला होता. सध्या देशात सुरू असलेल्या सीबीआय आणि ईडीच्या कारवाईसंदर्भातील हा प्रश्न होता. त्यामुळे, या प्रश्नावरील उत्तरही तसेच अपेक्षित होते. 

देशातील सीबीआय आणि ईडी या तपासयंत्रणा स्वतंत्र आहेत की नाही? असा प्रश्न यश यांना विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी यश यांची मुलाखत होती, त्यावेळीच एका मीडिया हाऊसवर ईडीची रेड पडल्याची बातमी आली होती. त्याअनुषंगानेच त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यश यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की, माझ्या मते भारतात सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणा अंशकालीन स्वतंत्र आहेत, येथील टॉप अधिकाऱ्यांची नियुक्ती ही सरकारच्याच माध्यमातून करण्यात येते. तर, अनेकदा या यंत्रणांकडून करण्यात आलेल्या रेडचे कारणही सर्वसामान्य लोकांना माहिती नसते. या उत्तरासह यश यांनी एक सूचनाही केली होती. त्यानुसार, संसदेत या यंत्रणांसाठी एक समिती असायला हवी, या समितीने संबंधित यंत्रणांनी कोणत्या कारणाने ही छापेमारी केली, काय ठोस पुरावा होता म्हणून ही कारवाई केली, हे स्पष्ट करावे. भलेही सर्वसामान्य नागरिकांपासून ते गोपनीय ठेवण्यात येईल. पण, विरोधी पक्षाला ते माहिती असायला हवं, असे उत्तर यश यांनी दिले होते.   

दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, बिहारच्या शुभमकुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, बिहारच्याच यश झुलका यांनी देशात 4 था क्रमांक पटकावला आहे. यश यांनी दिल्ली विश्वविद्यालायातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. तर 2019 मध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे युपीएससी परीक्षेसाठी कुठलेही कोचिंग क्लास न लावता त्यांनी हे यश मिळवले आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBiharबिहारexamपरीक्षा