शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना ५० वर्षे शोधू शकला नाही पाकिस्तान, त्यांचा आज पद्मश्रीनं सन्मान; कोण आहेत काझी सज्जाद? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:00 IST

पाकिस्तानी सैन्यात कर्नल पदावर राहिलेल्या काझी सज्जाद अली झहीर यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. या सोहळ्यात एका विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. पाकिस्तानी सैन्यात कर्नल पदावर राहिलेल्या काझी सज्जाद अली झहीर (quazi sajjad ali zahir gets padma shri award) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं. कर्नल झहीर यांनी पाकिस्तानी लष्करातील अनेक गुप्त कागदपत्रं, दस्तावेज भारताला सोपवले होते. बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या हजारो तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं होतं. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तान सरकारनं त्यांना मृत्यूदंड देण्यासाठी ऑर्डर काढली होती.

काझी सज्जाद अली झहीर भारतात आल्यानंतर बांगलादेशातील त्यांचं घर पाकिस्तानी सैनिकांनी पेटवून दिलं. त्यांच्या आईला आणि बहिणीला पाकिस्तानी सैन्यानं टार्गेट केलं. मात्र त्या सुरक्षितस्थळी पळून गेल्या. कर्नल झहीर १९६९ च्या अखेरीस पाकिस्तानी लष्करात सहभागी झाले. त्यावेळी बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. पाकिस्तानी सैन्याच्या तोफखान्यात कार्यरत असलेल्या झहीर यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानच्या विविध भागांत पाठवण्यात आलं होतं.

कर्नल झहीर पाकिस्तानी लष्कराच्या १२ पॅरा ब्रिगेड स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्य पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगलादेश) लोकांवर करडी नजर ठेवून होतं. पूर्व पाकिस्तानातील जनता अत्याचार आणि नरसंहाराला कंटाळून बंड करतील अशी भीती पाकिस्तानी सैन्याला होती. पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जाताच पाकिस्तानी सैन्यानं स्थानिक जवान आणि अधिकाऱ्यांनी ग्राऊंड ड्युटीवरून हटवलं. बंड टाळण्यासाठी दोन बांगलादेशी सैनिकांना सोबत ड्युटी देणं बंद करण्यात आलं.

पाकिस्तानी सैन्य बांगलादेशात करत असलेले अत्याचार पाहून कर्नल झहीर यांना धक्काच बसला. त्यांनी पाकिस्तानमधून पळ काढला आणि भारतात आले. पाकिस्तानी सैन्याबद्दलची अतिशय गोपनीय माहिती त्यांनी भारताला दिली. अंगावर असलेले कपडे आणि खिशात असलेले २० रुपये घेऊन झहीर जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये आले. पाकिस्तान सोडताना त्यांनी स्वत:सोबत अतिशय महत्त्वाचे दस्तावेज आणले. ते दस्तावेज त्यांनी भारत सरकारला सोपवले.