शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

मुलीने पळून जाऊन केलं लग्न, पंचायतीने प्रेमविवाहावरच घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 13:32 IST

सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे.

लुधियाना- एका प्रेमी युगुलाने पळून लाऊन लग्न केल्याची घटना पंजाबमध्ये घडली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे. चणकोईया खुर्द गावातील ही घटना असून गावाने थेट प्रेमविवाहावर बंदी घालणारा ठरावच मंजूर केला. तसंच या ठरावाचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर व त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या नातेवाईकांवर बहिष्कार टाकला जाईल, अशी एकप्रकारची धमकी दिली आहे. 

29 एप्रिलला गावातील पंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आला. गावातील गुरुद्वारा समिती आणि स्पोर्ट्स क्लबनेही या ठरावाला मान्यता दिली. या ठरावानुसार आता गावात प्रेमविवाहावर बंदी असेल. पंचायतीने संमत केलेल्या ठरावात नमूद केलं आहे की, एखाद्या मुलाने किंवा मुलीने त्यांच्या मनानुसार लग्न केलं तर त्यांना समजातून बहिष्कृत केलं जाईल. तसंच दोघांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध ठेवले तर त्यांच्यावरही बहिष्कार टाकला जाईल. दुकानदारांनी त्या जोडप्याला कोणत्याही वस्तू विकता येणार नाही. अशा जोडप्याला गावातील सार्वजनिक जागा वापरता येणार नाही. ग्रामपंचायत तसेच गुरुद्वाराने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभही घेता येणार नाही. पंचायतीच्या या ठरावाची माहिती पत्रकाद्वारे गावातील बस थांबा आणि रस्त्यालगतच्या भिंतीवर लावण्यात आली आहे. 

दरम्यान, पंचायतीच्या या ठरावाचं गावाचे सरपंच हकम सिंग यांनी समर्थन केलं आहे. हा फतवा नसून गावाने एकमताने घेतलेला निर्णय आहे. मुलीचे आजोबा आणि कुटुंबीयांनीच असा ठराव मांडण्याची मागणी केली होती. ठराव मंजूर केला नाही तर आत्मदहन करु असा इशारा त्यांनी दिला होता, असं ते म्हणाले.  दरम्यान, पंचयतीच्या या ठरावाची अंमलबजावणी होणार नसल्याचं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. संविधानातील मूलभूत अधिकारांचं हे उल्लंघन आहे, असं सामाजिक संघटनांनी म्हटलं आहे.