शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मुलीने पळून जाऊन केलं लग्न, पंचायतीने प्रेमविवाहावरच घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 13:32 IST

सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे.

लुधियाना- एका प्रेमी युगुलाने पळून लाऊन लग्न केल्याची घटना पंजाबमध्ये घडली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसेल असा निर्णय पंचायतीने घेतला आहे. चणकोईया खुर्द गावातील ही घटना असून गावाने थेट प्रेमविवाहावर बंदी घालणारा ठरावच मंजूर केला. तसंच या ठरावाचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर व त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या नातेवाईकांवर बहिष्कार टाकला जाईल, अशी एकप्रकारची धमकी दिली आहे. 

29 एप्रिलला गावातील पंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आला. गावातील गुरुद्वारा समिती आणि स्पोर्ट्स क्लबनेही या ठरावाला मान्यता दिली. या ठरावानुसार आता गावात प्रेमविवाहावर बंदी असेल. पंचायतीने संमत केलेल्या ठरावात नमूद केलं आहे की, एखाद्या मुलाने किंवा मुलीने त्यांच्या मनानुसार लग्न केलं तर त्यांना समजातून बहिष्कृत केलं जाईल. तसंच दोघांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध ठेवले तर त्यांच्यावरही बहिष्कार टाकला जाईल. दुकानदारांनी त्या जोडप्याला कोणत्याही वस्तू विकता येणार नाही. अशा जोडप्याला गावातील सार्वजनिक जागा वापरता येणार नाही. ग्रामपंचायत तसेच गुरुद्वाराने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभही घेता येणार नाही. पंचायतीच्या या ठरावाची माहिती पत्रकाद्वारे गावातील बस थांबा आणि रस्त्यालगतच्या भिंतीवर लावण्यात आली आहे. 

दरम्यान, पंचायतीच्या या ठरावाचं गावाचे सरपंच हकम सिंग यांनी समर्थन केलं आहे. हा फतवा नसून गावाने एकमताने घेतलेला निर्णय आहे. मुलीचे आजोबा आणि कुटुंबीयांनीच असा ठराव मांडण्याची मागणी केली होती. ठराव मंजूर केला नाही तर आत्मदहन करु असा इशारा त्यांनी दिला होता, असं ते म्हणाले.  दरम्यान, पंचयतीच्या या ठरावाची अंमलबजावणी होणार नसल्याचं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. संविधानातील मूलभूत अधिकारांचं हे उल्लंघन आहे, असं सामाजिक संघटनांनी म्हटलं आहे.