शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पंजाब-महाराष्ट्रातील नातेसंबंध दृढ होईल : चरणजितसिंग सप्रा

By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST

पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने दोन्ही राज्यातील

प्रसन्न पाध्ये, घुमान (संत नामदेव नगरी) :पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये प्रेम, बंधूभाव वाढेल, असा विश्वास स्वागत समितीतील सदस्य, माजी आमदार चरणजितसिंग सप्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.संमेलन मराठी सारस्वतांचे आणि मराठी भाषिक लोकांचे असले तरी या संमेलनाचे वैशिष्ट्य पंजाबातील घुमान या छोट्याशा गावी होत आहे. या संमेलनाला पंजाब सरकाराने पूर्ण पाठींबा दिला असल्याने सर्व सरकारी यंत्रणा, विविध संस्था हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. संत नामदेव यांच्याविषयी पंजाबी लोकांना आस्था असल्याने महाराष्ट्रातील पंजाबी नागरिकही या संमेलनाकडे आपलेपणाने पाहात आहे.माजी आमदार आणि स्वागत समितील सदस्य सप्रा या संमेलनास मुंबईहून आले आहेत. या निमित्त त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘संत नामदेव आणि गुरुगोविंदसिंहजी यांच्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाब एका वेगळ्या नात्यात जोडला गेला आहे. गुरुगोविंदसिंहजी आमच्यासाठी जेव्हढे पूजनिय आहेत, तेवढेच संत नामदेवही आहेत. त्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये जिव्हाळ्याचे नाते आहे.’’पंजाबातून अनेकजण आएएस, आयपीएस झाले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रात आपलेपणानेच सेवा केली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र अ‍ॅन्ड पंजाब कॉ. आॅप. बॅँक सुरू करण्यात आली आहे. या बॅँकेत ७० टक्के कर्मचारी महाराष्ट्रीय आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधतर्फे मुंबईत खालसा कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाल्याची आठवण सप्रा यांनी सांगितली. या संमेलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्रासाठी नवा अध्याय लिहिला जाणार आहे.