शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पतीची हत्या केली असेल तरी पत्नी फॅमिली पेन्शनसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निकाल

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 18:50 IST

एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची विधवा पत्नीने हत्या केली असली, तरी तिला फॅमिली पेन्शनचा लाभ मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

ठळक मुद्देपंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकालपतीची हत्या केली असली, तरी पत्नीला फॅमिली पेन्शन मिळायला हवी - हायकोर्टहरियाणा सरकारने आदेश काढून चूक केली - हायकोर्ट

चंदीगड : एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची हत्या त्याच्याच पत्नीने केली असली, तरी ती फॅमिली पेन्शनसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची विधवा पत्नीने हत्या केली असली, तरी तिला फॅमिली पेन्शनचा लाभ मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

अंबाला येथील रहिवासी असलेल्या बलजीत कौर यांची फॅमिली पेन्शन रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. बलजीत कौर नामक महिलेवर हत्येचा आरोप सिद्ध झाला. म्हणून तिला फॅमिली पेन्शनचा लाभ न देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला होता.

काय आहे प्रकरण?

बलजीत कौर यांचे पती तरसेम सिंग हरियाणा सरकारी कर्मचारी होते. सन २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००९ मध्ये बलजीत कौर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. सन २०११ मध्ये बलजीत कौर यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्या दोषी ठरल्या होत्या. बलजीत कौर यांच्यावर दोषसिद्धी झाल्यानंतर हरियाणा सरकारने पतीच्या मृत्यूनंतर मिळणारे वित्तीय अधिकार रोखले होते.

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नियम काय सांगतो?

नियमानुसार, सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला पती कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती तारखेपर्यंत वित्तीय लाभ दिले जातात. तसेच सेवानिवृत्ती झाल्यानंतर पत्नीला फॅमिली पेन्शनही लागू होते. सरकारने काढलेला आदेश नियमांविरुद्ध आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने सरकारी आदेश रद्द केला. 

सरकारने आदेश काढून चूक केली

हरियाणा सरकारने आदेश काढून चूक केली. जरी, पतीची हत्या त्याच्या पत्नीनेच केली असली, तरी तिला वित्तीय अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. सोन्याचे अंड देणारी कोंबडी कोणीही कापत आही. केवळ पैशासाठी पत्नीने कर्मचाऱ्याची हत्या करू नये, म्हणून हा नियम बनवण्यात आला होता, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPunjabपंजाबHaryanaहरयाणा