शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

पतीची हत्या केली असेल तरी पत्नी फॅमिली पेन्शनसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निकाल

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 18:50 IST

एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची विधवा पत्नीने हत्या केली असली, तरी तिला फॅमिली पेन्शनचा लाभ मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

ठळक मुद्देपंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकालपतीची हत्या केली असली, तरी पत्नीला फॅमिली पेन्शन मिळायला हवी - हायकोर्टहरियाणा सरकारने आदेश काढून चूक केली - हायकोर्ट

चंदीगड : एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची हत्या त्याच्याच पत्नीने केली असली, तरी ती फॅमिली पेन्शनसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची विधवा पत्नीने हत्या केली असली, तरी तिला फॅमिली पेन्शनचा लाभ मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

अंबाला येथील रहिवासी असलेल्या बलजीत कौर यांची फॅमिली पेन्शन रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. बलजीत कौर नामक महिलेवर हत्येचा आरोप सिद्ध झाला. म्हणून तिला फॅमिली पेन्शनचा लाभ न देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला होता.

काय आहे प्रकरण?

बलजीत कौर यांचे पती तरसेम सिंग हरियाणा सरकारी कर्मचारी होते. सन २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००९ मध्ये बलजीत कौर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. सन २०११ मध्ये बलजीत कौर यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्या दोषी ठरल्या होत्या. बलजीत कौर यांच्यावर दोषसिद्धी झाल्यानंतर हरियाणा सरकारने पतीच्या मृत्यूनंतर मिळणारे वित्तीय अधिकार रोखले होते.

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नियम काय सांगतो?

नियमानुसार, सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला पती कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती तारखेपर्यंत वित्तीय लाभ दिले जातात. तसेच सेवानिवृत्ती झाल्यानंतर पत्नीला फॅमिली पेन्शनही लागू होते. सरकारने काढलेला आदेश नियमांविरुद्ध आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने सरकारी आदेश रद्द केला. 

सरकारने आदेश काढून चूक केली

हरियाणा सरकारने आदेश काढून चूक केली. जरी, पतीची हत्या त्याच्या पत्नीनेच केली असली, तरी तिला वित्तीय अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. सोन्याचे अंड देणारी कोंबडी कोणीही कापत आही. केवळ पैशासाठी पत्नीने कर्मचाऱ्याची हत्या करू नये, म्हणून हा नियम बनवण्यात आला होता, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPunjabपंजाबHaryanaहरयाणा