शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
4
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
5
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
6
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
7
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
8
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
9
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
10
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
11
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
12
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
13
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
14
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
15
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
16
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
17
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
18
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
19
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
20
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

पुणे विमानतळाचे होणार खासगीकरण, पंतप्रधानांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:10 IST

नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग व अर्थमंत्रालयाला दिले आहेत

हरीश गुप्तानवी दिल्ली : नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग व अर्थमंत्रालयाला दिले आहेत. त्यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या विमानतळांचे चालू आर्थिक वर्षात खासगीकरण केले जाईल. मोदी सरकारकडून एअर इंडिया व राज्यांच्या मालकीच्या हॉटेल्सची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात दिल्लीतील हॉटेल अशोकचा समावेश आहे. हॉटेल व विमानतळ देखभालीतून लाभ मिळत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुण्याशिवाय लखनौ, जयपूर, चेन्नई, कोलकाता, कोची, अहमदाबाद व गुवाहाटी या विमानतळांचेही खासगीकरण होणार आहे. ही सर्व विमानतळे नफ्यात आहेत. त्यामुळे सरकार येथून मोठा महसूल मिळू शकतो. पीएमओने अर्थमंत्रालय व नीति आयोगाला या खासगीकरणासाठी विशेष यंत्रणा करण्यास सांगितले आहे. बोली लावण्याची पद्धत पूर्वीच्या यूपीए सरकारने दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळांसाठी वापरलेल्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल.या आधी मोदी सरकारने विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या विमानतळांवरील व्यवस्थापनाची कंत्राटे खासगी क्षेत्रात देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयानुसार जयपूर आणि अहमदाबाद विमानतळांसाठी निविदा मागविण्यात आल्यावर त्या अपयशी ठरल्या व या प्रस्तावांना प्रतिसाद मिळाला नाही. आता विमानतळांचे संपूर्ण नियंत्रण खासगी क्षेत्राकडे देण्याची शक्यता अजमावून बघण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) परवानगी दिली आहे. विमानतळे ३० वर्षांसाठी बाहेरच्या कंत्राटदारांसाठी दिली जाण्याची शक्यता आहे आणि दर आगाऊच ठरवले जातील.यूपीए सरकारने दिल्ली व मुंबई विमानतळांचे खासगीकरण विमानतळाला जो सकल महसूल मिळेल, त्यातील सर्वात जास्त हिस्सा विमानतळ प्राधिकरणला देण्याचे ठरले होते. या व्यवस्थेत विकसकाला गुंतवणुकीवर परताव्याचे प्रमाण कमी झाले व त्याची भरपाई करून घेण्यासाठी दरात वाढ होईल. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळांचे कामकाज आणि देखभालीसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया औपचारिक निविदा जीव्हीके ग्रुप या एकमेव कंपनीने सादर केल्यामुळे आता खुंटली आहे. त्यामुळे मोदी सरकारला खासगीकरणाच्या मॉडेलकडे लक्ष देणे भाग पडू शकते.