शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Pulwama Attack: सर्व विरोधी पक्ष लष्कर,केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 05:35 IST

पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, ए. के. अ‍ॅन्टोनी हेही उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, भारतीय लष्कर, नागरिकांवर होणारे दहशतवादीहल्ले हे अतिशय घृणास्पद कृत्य आहे. या देशात फूट पाडण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे. त्यासाठी त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी हे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. दहशतवाद्यांनी आजवर केलेले हल्ले जनता कधीच विसरणार नाही.कारवाईसाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सारा देश शोकसागरात बुडालेला आहे. अशा वेळी लष्कर व केंद्र सरकारच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा वेळी त्यांच्यासोबत असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, ते आम्ही पार पाडत आहोत. या हल्ल्यासंदर्भातील इतर पैलूंवर काँग्रेस पक्ष येत्या काही दिवसांत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. पुलवामा हल्ला करणाऱ्यांना मुँहतोड जवाब देण्याची मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्याविषयी राहुल गांधी म्हणाले की, मी या गोष्टीबाबत काहीच प्रतिक्रिया देणार नाही. हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक व्यथित झाला आहे. संतापला आहे.कठोरपणे मुकाबला हवा : मनमोहन सिंगमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, दहशतवादी कृत्यांचा कठोरपणेच मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. देशाचे ऐक्य कायम राखले पाहिजे. गुलाम नबी आझाद म्हणाले की, पुलवामामधील घातपात हा देशावर झालेला हल्ला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला