शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

दाळीचा उद्योगही संकटात! आवक घटली : ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 9, 2015 01:42 IST

लातूर : देशात लातूरच्या तूर दाळीचा उद्योग प्रसिद्ध आहे़ मात्र यंदाच्या दुष्काळामुळे तूर, उडीद, मुग आणि हरभर्‍याची आवक घटल्याने ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे या मिलमध्ये हमाली व काम करणार्‍या कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हजार क्विंटलची क्षमता असलेल्या एका मिलकडे ५०० ते ६०० क्विंटलचीच आवक होत आहे़ परिणामी, या मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यातच पाणीकपात झाल्यामुळे हा उद्योग संकटात आला आहे़

लातूर : देशात लातूरच्या तूर दाळीचा उद्योग प्रसिद्ध आहे़ मात्र यंदाच्या दुष्काळामुळे तूर, उडीद, मुग आणि हरभर्‍याची आवक घटल्याने ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे या मिलमध्ये हमाली व काम करणार्‍या कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हजार क्विंटलची क्षमता असलेल्या एका मिलकडे ५०० ते ६०० क्विंटलचीच आवक होत आहे़ परिणामी, या मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यातच पाणीकपात झाल्यामुळे हा उद्योग संकटात आला आहे़
लातूर शहरातील जुन्या व नव्या एमआयडीसीत एकूण ६० दालमिल आहेत़ एका मिलमध्ये दहा ते बारा कामगार आणि पाच ते सहा हमालांना रोजगार आहे़ जवळपास ७२० कामगार आणि ३६० हमालांचे पोट या उद्योगावर आहे़ मात्र यंदा दुष्काळामुळे तूर, उडीद, मुग आणि हरभर्‍याची आवक घटलेली आहे़ लातूरच्या मार्केट यार्डात दिवसाकाठी ५०० क्विंटल तुरीची आवक आहे आणि मिल ६० आहेत़ एका मिलची हजार क्विंटल दाळ करण्याची क्षमता आहे़ परंतू आवकच नाही़ त्यामुळे ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ दोन पाळीमध्ये चलणार्‍या या मिल दिवसाला एक तासच चलत आहेत़ परिणामी, या मिलवर अवलंबून असणार्‍या कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ मिल मालकांनी या मजुरांना सध्या कामावर ठेवले असले तरी भविष्यात त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ यंदा शेतकर्‍यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा केला असला तरी तुर, उडीद, मुगाचाही पेरा बर्‍यापैकी केला होता़ पाच महिन्यात तुरीचे पीक येते़ परंतू पाऊस न झाल्यामुळे हे पीक वाया गेले असल्याने मिलकडे तूर येण्याची शक्यताच नाही़ त्यामुळे यंदा हा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे दालमिल असोसिएशनचे उपाध्यक्ष बालाप्रसाद बिदादा यांनी सांगितले़
आवक नसल्याने पूर्ण क्षमतेने दालमिल चलू शकत नाहीत़़़
लातूर जिल्‘ातील प्रत्येकी एका दालमिलकडे तूर ५०० ते ६००, मुग ४०० ते ५००, उडीद ३०० आणि हरभरा १००० क्विंटल अशी आवक आहे़ एवढ्या तुटपुंज्या आवकीवर पूर्ण क्षमतेने दालमिल चलू शकत नाहीत़ या दुष्काळामुळे शेतकरी, मिलमालक, हमाल, कामगार असे सर्वच अडचणीत सापडले आहेत़ हमालही माल येण्याची वाट पाहतात आणि कामगार काम नसल्यामुळे बसून राहतात, अशी स्थिती दाळ उद्योगाची झाली असल्याचे असोसिएशनचे उपाध्यक्ष बिदादा यांनी सांगितले़