शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

लोकशाहीत टीका, सूचनांंचे स्थान महत्त्वाचे

By admin | Updated: May 29, 2017 01:24 IST

आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त आमच्या सरकारची कामे, उणिवा समजून घेण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त आमच्या सरकारची कामे, उणिवा समजून घेण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या जनमत चाचण्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून रविवारी आभार मानले.लोकशाहीत टीका आणि सूचना यांना कायमच महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा आदर करायलाच हवा, असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले की, सरकार हे जनतेच्या मतांवर निवडून आलेले असते. त्यामुळे सरकारने जनतेचे म्हणजे ऐकून घ्यायलाच हवे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत. विधायक टीकेमुळे तर लोकशाहीला बळच मिळते, असे सांगून सरकारवर टीका करणाऱ्यांचे तसेच विविध सूचना करणाऱ्यांचे आपण आभार मानू इच्छितो. जनमत चाचण्यांमुळे सरकारचे काम कशा प्रकारे सुरू आहे, याचा अंदाज येणेही सोपे झाले आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून, त्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, धर्म, जात, संस्कृती परंपरा आणि विचार वेगळे असले तरी त्यातून ऐक्य, शांतता व सद्भावना यांचेच दर्शन घडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांना आदरांजली वाहिली. सावरकर आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी जे लिखाण केले, त्यातून स्वातंत्र्यलढ्याला प्रोत्साहन मिळाले होते, असेही ते म्हणाले.त्यांनी तुरुंगातून सावरकर यांनी लिहिलेल्या कवितांचा मुद्दाम उल्लेख केला. मोदी यांनी पर्यावरण दिवसानिमित्त वृक्षारोपणात सर्वांनी योगदान द्यावे, पावसाळ्यात प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, असे ते म्हणाले. रजेच्या काळात प्रत्येकाने नेहमीपेक्षा काही तरी वेगळे करायला हवे, असे आवाहन पंतप्रधानांनी याआधी केले होते. आपल्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अफरोज यांचे अभिनंदनमुंबईच्या वर्सोवा येथील समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करणारे अफरोज शहा आणि तेथील रहिवासी संघटना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात कौतुक करतानाच स्वच्छ भारत मोहिमेला जनआंदोलनाचे रूप येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. च्वर्सोवा येथे शहा व तेथील रहिवाशांनी यशस्वीपणे सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेची दखल घेतानाच मोदी यांनी अन्य राज्यांत ही मोहीम राबविण्यासाठी स्पर्धा सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.