शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

लोकशाहीत टीका, सूचनांंचे स्थान महत्त्वाचे

By admin | Updated: May 29, 2017 01:24 IST

आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त आमच्या सरकारची कामे, उणिवा समजून घेण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त आमच्या सरकारची कामे, उणिवा समजून घेण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या जनमत चाचण्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून रविवारी आभार मानले.लोकशाहीत टीका आणि सूचना यांना कायमच महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा आदर करायलाच हवा, असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले की, सरकार हे जनतेच्या मतांवर निवडून आलेले असते. त्यामुळे सरकारने जनतेचे म्हणजे ऐकून घ्यायलाच हवे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत. विधायक टीकेमुळे तर लोकशाहीला बळच मिळते, असे सांगून सरकारवर टीका करणाऱ्यांचे तसेच विविध सूचना करणाऱ्यांचे आपण आभार मानू इच्छितो. जनमत चाचण्यांमुळे सरकारचे काम कशा प्रकारे सुरू आहे, याचा अंदाज येणेही सोपे झाले आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून, त्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, धर्म, जात, संस्कृती परंपरा आणि विचार वेगळे असले तरी त्यातून ऐक्य, शांतता व सद्भावना यांचेच दर्शन घडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांना आदरांजली वाहिली. सावरकर आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी जे लिखाण केले, त्यातून स्वातंत्र्यलढ्याला प्रोत्साहन मिळाले होते, असेही ते म्हणाले.त्यांनी तुरुंगातून सावरकर यांनी लिहिलेल्या कवितांचा मुद्दाम उल्लेख केला. मोदी यांनी पर्यावरण दिवसानिमित्त वृक्षारोपणात सर्वांनी योगदान द्यावे, पावसाळ्यात प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, असे ते म्हणाले. रजेच्या काळात प्रत्येकाने नेहमीपेक्षा काही तरी वेगळे करायला हवे, असे आवाहन पंतप्रधानांनी याआधी केले होते. आपल्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अफरोज यांचे अभिनंदनमुंबईच्या वर्सोवा येथील समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करणारे अफरोज शहा आणि तेथील रहिवासी संघटना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात कौतुक करतानाच स्वच्छ भारत मोहिमेला जनआंदोलनाचे रूप येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. च्वर्सोवा येथे शहा व तेथील रहिवाशांनी यशस्वीपणे सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेची दखल घेतानाच मोदी यांनी अन्य राज्यांत ही मोहीम राबविण्यासाठी स्पर्धा सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.