शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

दहशतवादी मुलाचा मृतदेह न स्वीकारणा-या पित्याचा अभिमान- राजनाथ सिंह

By admin | Updated: March 9, 2017 16:19 IST

लखनऊ चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाचा मृतदेह नाकारणा-या पित्याचा अभिमान वाटतो असं कौतुक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - लखनऊ चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाचा मृतदेह नाकारणा-या पित्याचा अभिमान वाटतो असं कौतुक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. लोकसभेत लखनऊ चकमकीवर निवेदन देत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवादी सैफुल्लाचे वडिल सरताज मोहम्मद यांनी एका देशद्रोह्याचा मृतदेह मी स्विकारणार नाही असं सांगत मृतदेह स्विकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या या निर्णयाचं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत कौतुक करताना आम्हाला तुमचा अभिमान आहे असं म्हटलं आहे. 
 
त्या वडिलांसाठी मी सहानुभूती व्यक्त करतो, सदनमधील सर्वांचं माझ्याशी एकमत असेल अशी खात्री व्यक्त करतो. सरकरला अशा पित्याचा अभिमान वाटतो', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. सरताज मोहम्मद यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून 'हा संदेश संपुर्ण देशासाठी असला पाहिजे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला प्रतिष्ठित मंत्र्याकडून आदराची वागणूक मिळत असल्याचं सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.
 
 
लखनऊत तब्बल 12 तास सुरु राहिलेच्या चकमकी सैफुल्ला ठार झाला आहे. कमांडोजनी त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला ठार करण्यात आल्यानंतर त्याच्याजवळून इसीसचा झेंडा आणि ट्रेन टाईमटेबल सापडलं. 
 
(लखनऊमधील दहशतवादी इसिसनेच प्रेरित- पोलीस)
 
दहशतवादी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. आपल्या मुलाला देशद्रोही म्हणत एका देशद्रोह्याचा मृतदेह मी घेणार नाही असं बोलले. दुसरीकडे सैफुल्लाच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल कळल्यानंतर धक्काच बसला. मात्र दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केला. 
 
सैफुल्लाचे वडील सरताज यांनी बुधवारी अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ते बोलले की, 'त्याने देशविरोधी काम केलं आहे. आम्ही त्याच्यावर नाराज असून अशा देशद्रोह्याचा मृतदेह अजिबात घेणार नाही'. त्यांनी सांगितलं की, 'कौटुंबिक भांडणानंतर सैफुल्ला घरातून निघून गेला होता, आणि  त्यानंतर परत आलाच नाही'. सरताज यांनी सांगितलं की, 'काहीच काम करत नसल्याने काही महिन्यांपुर्वी मी त्याला मारलं होतं, त्यानंतर तो घर सोडून पळून गेला होता. गेल्या महिन्यात फोन करुन त्याने आपण सौदीला चाललो असल्याचं सांगितलं होतं'.
 
सैफुल्ला चकमकीत ठार झाल्यापासून त्याच्या नातेवाईकांना त्याने दहशतवादाचा मार्ग स्विकारला होता यावर विश्वासच बसत नाही आहे. एका नातेवाईकाने सांगितलं की, 'प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे. दिवसातून पाच वेळा तो नमाज पडत असे. त्याच्याबद्दल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता'.