शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे दिल्लीत आगडोंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:36 IST

Citizen Amendment Act Protest : आंदोलक आक्रमक : बस जाळल्या, पोलिसांशी संघर्ष, निमलष्करी जवान तैनात

उमेश जाधव/सुमेध बनसोड ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेंड््स कॉलनी भागात आंदोलकांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या चार बस व पोलिसांची सहा वाहने जाळली. तो आगडोंब विझविताना अग्निशमन दलाचे तीन जवान व सहा पोलीस जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात निमलष्करी दलांचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हिंसाचाराचा निषेध केला व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.अनेक ठिकाणी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर सौम्य लाठीमारही करण्यात आला. पोलिसांनी जामिया मिलिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरून अश्रुधुराची नळकांडी फोडली. काही विद्यार्थ्यांना लाठीमार करत कॅम्पसच्या बाहेर ओढून आणण्यात आले. हात वर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस हॉस्टेल व ग्रंथालयातून बाहेर घेऊन येताना दिसले. पोलिसांनी विनापरवाना कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले, असा आरोप विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर वासीम अहमद खान यांनी केला.

मूळच्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्त्या मंजूर झाल्यानंतर लगेचच जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून ५ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले व बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या.या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके संध्याकाळनंतर बंद करण्यात आली व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.हिंसेमागे काँग्रेसचा हात - मोदीनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतात सुरू असलेले हिंसक आंदोलन पेटविण्यामागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला आहे.विधेयकात सुधारणा करू- शहानागरिकत्व दुरुस्ती कायद्यात आवश्यकता असल्यास आणखी काही सुधारणा करण्यात येतील. मेघालयाच्या प्रश्नांवर नक्की तोडगा काढू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक