शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

CAA Protest : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे दिल्लीत आगडोंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:36 IST

Citizen Amendment Act Protest : आंदोलक आक्रमक : बस जाळल्या, पोलिसांशी संघर्ष, निमलष्करी जवान तैनात

उमेश जाधव/सुमेध बनसोड ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेंड््स कॉलनी भागात आंदोलकांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या चार बस व पोलिसांची सहा वाहने जाळली. तो आगडोंब विझविताना अग्निशमन दलाचे तीन जवान व सहा पोलीस जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात निमलष्करी दलांचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हिंसाचाराचा निषेध केला व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.अनेक ठिकाणी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर सौम्य लाठीमारही करण्यात आला. पोलिसांनी जामिया मिलिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरून अश्रुधुराची नळकांडी फोडली. काही विद्यार्थ्यांना लाठीमार करत कॅम्पसच्या बाहेर ओढून आणण्यात आले. हात वर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस हॉस्टेल व ग्रंथालयातून बाहेर घेऊन येताना दिसले. पोलिसांनी विनापरवाना कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बळजबरीने बाहेर काढले, असा आरोप विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर वासीम अहमद खान यांनी केला.

मूळच्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्त्या मंजूर झाल्यानंतर लगेचच जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून ५ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले व बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या.या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके संध्याकाळनंतर बंद करण्यात आली व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.हिंसेमागे काँग्रेसचा हात - मोदीनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतात सुरू असलेले हिंसक आंदोलन पेटविण्यामागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला आहे.विधेयकात सुधारणा करू- शहानागरिकत्व दुरुस्ती कायद्यात आवश्यकता असल्यास आणखी काही सुधारणा करण्यात येतील. मेघालयाच्या प्रश्नांवर नक्की तोडगा काढू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक