शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

इस्रोच्या मदतीने ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 04:50 IST

भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते.

- नितीन नायगावकर नवी दिल्ली : भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने २०१६ मध्ये इस्रोेशी करार करून सॅटेलाईटद्वारे पुरातत्वीय वारशांना संरक्षण दिले. परिणामी, पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीतील ३,६०० वास्तूंवर नियंत्रण ठेवणे इस्रोमुळेच शक्य होत आहे.प्रत्येक राज्यात काही ऐतिहासिक वास्तू केंद्रे, तर काही राज्ये सरकारच्या अखत्यारीत आहेत. बरीच मंदिरे, गड-किल्ले अतिक्रमणाच्या विळख्यातून गेल्या काळात सोडविण्यात आली आहेत; पण वस्ती वाढ व घरांची उंची वाढल्याने ऐतिहासिक वारशाचे महत्त्व राखण्यास अडथळा येतो. उंचावरील किंवा तळघरातील वास्तूंना त्याचा धोका नाही; पण गावांच्या मधोमध वा अगदी शहरांलगतच्या वास्तूंना नक्कीच आहे. या वास्तूंच्या शंभर मीटर परिसरात बांधकामास बंदी असली तरीही यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असल्याने केंद्र सरकारने २०१० मध्ये राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची स्थापना केली. त्यामुळे इस्रोेद्वारे या सर्व स्मारकांना संरक्षण देण्यात आले.आता राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भुवन अ‍ॅपद्वारे इस्रोच्या पोर्टलवर जाता येते. या पोर्टलवर ३,६०० पैकी कुठल्याही स्मारकाच्या कक्षा पाहता येतात. शंभर मीटरच्या कक्षेतील घर पाडून नवे घर बांधता येत नाही. जुन्याच घरात बदल करण्याची परवानगी आहे, तर तीनशे मीटरच्या कक्षेतील घरांना कुठलेही बांधकाम करायचे असेल, तर स्मारक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. पूर्वी परवानगीसाठीही एक वर्ष लागायचे. आता आॅनलाईन सुविधेमुळे अवघ्या महिनाभरात कार्यवाही होते. दरवर्षी सुमारे एक हजार अर्ज येतात, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव नवनीत सोनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>मुख्य सचिवांना पत्रराष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची आॅनलाईन यंत्रणा अवलंबण्यासाठी प्राधिकरणाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरात राहणाऱ्यांना घराच्या बांधकामाची परवानगी घेण्यासाठी पारंपरिक यंत्रणेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे नवनीत सोनी म्हणाले.>सध्या मुंबई व दिल्ली या दोनच शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राधिकरणाची आॅनलाईन यंत्रणा स्वीकारली आहे. येत्या काळात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश ही राज्येही जुळणार आहेत.

टॅग्स :isroइस्रो