शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 01:14 IST

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

उन्नाव : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळीकेला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने असे वातावरण निर्माण केले आहे की, राज्यातील गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही. भाजप सरकार असे म्हणत आहे की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना थारा नाही. मला तर असे वाटते की, त्यांनी जे उत्तर प्रदेश बनविले आहे त्यात महिलांसाठी जागा नाही.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबियांनी मला सांगितले की, कशाप्रकारे गुन्हेगारांनी या कुटुंबियाला त्रास दिला. पीडित कुटुंबाच्या मुलीला धमकी दिली गेली की, मुलीचे नाव शाळेतून काढून टाकले जाईल. त्यामुळे तिने शाळेत जाण्याची हिंमत केली नाही. मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. जूनमध्ये शेतातील पीक जाळून टाकण्यात आले. या कुटुंबाला सातत्याने त्रास दिला गेला.गुन्हेगारांना कुणाचाही धाक राहिलेला नाही

प्रियांका गांधी म्हणाल्या की, अशी चर्चा आहे की गावच्या प्रमुखाचे भाजपशी संबंध आहेत. या प्रकारामागील सत्य समोर आणण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. त्या म्हणाल्या की, अशा लोकांना संरक्षण दिले जाऊ शकते. असे प्रकार नेहमी होत आहेत.च्हे प्रकरण राजकीय न करता प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे की, अशा घटना सातत्याने का होत आहेत? आज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. एका टष्ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने पीडितेला सुरक्षा दिली नाही. गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली? असे अनेक सवाल त्यांनी केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण