शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 20:17 IST

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रम सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळले. या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांनी देशातील सध्याच्या ज्वलंत आव्हानांवर आपला दृष्णिकोण जगासमोर ठेवला.

अहिंसा हा आपला मुळ स्वभाव आहे. मात्र काही लोक बिघडलेले आहेत. मी मुंबईत रावणाचा उल्लेख केला होता. कारण रावणात सर्व काही होते, पण त्याचे मन अहिंसे विरोधात होते. यामुळे रामाने त्याचा वध केला. याच प्रकारे गुंडांकडून मार न खाणेही आपला धर्म आहे. त्यांना धडा शिकवणे आपला धर्म आहे. आम्ही शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाही. मात्र, ते आपल्या धर्माचे पालन करणार नसतील तर आपल्या प्रजेचे रक्षण करणे हा राजाचा धर्म आहे. यामुळे राजा आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी जे पावले उचलेल, ते लोक लक्षात ठेवतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत बोलत होते.

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रम सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळले. या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांनी देशातील सध्याच्या ज्वलंत आव्हानांवर आपला दृष्णिकोण जगासमोर ठेवला.

भागवत पुढे म्हणाले, या आयोजनात हिंदू मॅनिफेस्टोचा विषय दिसला. हे एक असे प्रपोजल आहे ज्याची सर्वांनी चर्चा करायला हवी आणि ज्यावर सर्वांची सहमती व्हायला हवी. अशा सहमतीची आवश्यकता काय? तर जगाला नवा मार्ग हवा आहे. विश्व कल्याणासाठी, मानवतेच्या रक्षणासाठी मानवतेसाठी तिसरा मार्ग हवा आहे. तो भारताकडे आहे. तो भारताने आपल्या परंपरेतून द्यायला हवा.

'केवळ कर्मकांड म्हणजे धर्म नाही' -"आपण धर्माला केवळ कर्मकांडच समजलो. आपण धर्म प्रार्थनास्थळे आणि खाण-पाणाच्या पद्धतीशी जोडला. अर्थात पूजापाठा आणि काय खावे यातच धर्म मानला. सर्वांचे मार्ग त्यांच्यासाठी योग्य असतात. माझा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे, पण मी इतरांच्या मार्गाचाही आदर करतो. मात्र, माझेच चांगले आणि इतरांचं वाईट असे नसावे. आज हिंदू समाजाला हिंदू धर्म समजून घेण्याची गरज आहे," असेही भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद