शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

तीन वर्षांत घरोघरी येणार विजेचे प्रीपेड मीटर, केंद्र सरकारचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:06 IST

येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल.

नवी दिल्ली : येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल. त्यामुळे वीजबिलांची थकबाकी हा विषय इतिहासजमा होईल.विजेच्या मीटरच्या उत्पादकांची एक बैठक केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केली होती. त्यात ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आर. के. सिंग म्हणाले की, येत्या तीन वर्षांत विजेचे मीटरिंग म्हणजेच वीजवापराची जोडणी व शुल्कआकारणी स्मार्ट व प्रीपेडहोणार आहे.त्यामुळे विजेचे बिल ग्राहकाच्या घरी पाठविणे इतिहासजमा होईल. अशा स्मार्ट प्रीपेड वीजमीटरचे उत्पादन वाढविणे व त्यांच्या किंमती कमी करणे ही काळाचीगरज आहे.आगामी काळात अशा मीटरची मागणी वाढणार असल्याने उत्पादकांनी तेवढी मीटर बनविण्याची तयारी करावी, असा सल्ला मंत्र्यांनी दिला. भविष्यातील एका ठराविक दिवसापासून प्रत्येक वीज जोडणीस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे सक्तीचे करण्याचा विचार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी करावी, असेही त्यांनी सुचविले.विजेची गळती होईल कमीअशा मीटरच्या वापरामुळे पारेषण व वितरणात होणारी विजेची गळती कमी होईल, वीज पुरवठादार कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, वीज बचतीला प्रोत्साहन मिळेल आणि कुशल युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

टॅग्स :Governmentसरकार