शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

पाकपुरस्कृत हल्ल्याचा निषेध ठराव

By admin | Updated: March 23, 2015 02:20 IST

शांतता आणि सामंजस्य हवे असेल तर पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे.

जम्मू : शांतता आणि सामंजस्य हवे असेल तर पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे. सांबा आणि कठुआ येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. हे दहशतवादी हल्ले म्हणजे शांतता प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी रचलेला कट असल्याचे सईद म्हणाले.जम्मू-काश्मीर विधानसभेत बोलताना सईद म्हणाले की, राज्याच्या जनतेने आपला कौल दिला आहे. अशा हल्ल्यांच्या निषेधासाठी आपण प्रस्ताव आणला पाहिजे. पाकचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सीमा व नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूंना शांतता नांदत होती.दरम्यान, सांबा व कठुआ येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करणारा ठराव दोन्ही सभागृहांत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींना ओळखून त्यांचा बीमोड करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत भारत सरकारने पाकला समज दिली पाहिजे, असे या ठरावात म्हटले आहे. सांबा व कठुआ येथील हल्ल्यांचा निषेध करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी सभात्याग केला. हल्ल्यावर चर्चा व्हावी व मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव नॅकॉचे देवेंद्रसिंग राणा यांनी मांडला. (वृत्तसंस्था)राज्यातील लोकांनी दृढनिश्चय केलेला आहे आणि अशा दहशतवादी हल्ल्यांमुळे ते मुळीच डगमगणार नाहीत. पाकिस्तानला जर शांतता आणि सलोखा हवा असेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या प्रशासनाने दहशतवादावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे सईद म्हणाले.