शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पाकपुरस्कृत हल्ल्याचा निषेध ठराव

By admin | Updated: March 23, 2015 02:20 IST

शांतता आणि सामंजस्य हवे असेल तर पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे.

जम्मू : शांतता आणि सामंजस्य हवे असेल तर पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे. सांबा आणि कठुआ येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. हे दहशतवादी हल्ले म्हणजे शांतता प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी रचलेला कट असल्याचे सईद म्हणाले.जम्मू-काश्मीर विधानसभेत बोलताना सईद म्हणाले की, राज्याच्या जनतेने आपला कौल दिला आहे. अशा हल्ल्यांच्या निषेधासाठी आपण प्रस्ताव आणला पाहिजे. पाकचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सीमा व नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूंना शांतता नांदत होती.दरम्यान, सांबा व कठुआ येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करणारा ठराव दोन्ही सभागृहांत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींना ओळखून त्यांचा बीमोड करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत भारत सरकारने पाकला समज दिली पाहिजे, असे या ठरावात म्हटले आहे. सांबा व कठुआ येथील हल्ल्यांचा निषेध करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी सभात्याग केला. हल्ल्यावर चर्चा व्हावी व मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव नॅकॉचे देवेंद्रसिंग राणा यांनी मांडला. (वृत्तसंस्था)राज्यातील लोकांनी दृढनिश्चय केलेला आहे आणि अशा दहशतवादी हल्ल्यांमुळे ते मुळीच डगमगणार नाहीत. पाकिस्तानला जर शांतता आणि सलोखा हवा असेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या प्रशासनाने दहशतवादावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे सईद म्हणाले.