शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अयोध्या वादावर ६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:33 IST

अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे

लखनौ : अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे. बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले, यांनी आपण संत व महंतांना भेटण्यासाठी अयोध्येला भेट देणार आहोत. राम मंदिर त्या वादग्रस्त जागी उभारावे, असे मत रिझवी यांनी व्यक्त केलेले होते.अयोध्येचा वाद शांततेने आपापसात मिटावा, यासाठी मसुदा प्रस्तावावर मी आधीच त्यातील अनेकांशी आणि काही याचिकांकर्त्यांशी अटी आणि शर्तींबद्दल चर्चा केलेली आहे. आपापसातील सहमतीसाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार करू शकू, अशी आशा आहे, असे रिझवी म्हणाले. रिझवी यांनी गेल्या महिन्यात श्री श्री रविशंकर यांची बंगळुरूत भेट घेऊन राम मंदिराच्या जागेबद्दल वक्फ बोर्डची भूमिका सांगितली. वादग्रस्त जागी मशीद बांधली जाऊ नये, त्याऐवजी मुस्लीम लोकसंख्येच्या इतर ठिकाणी ती बांधावी, असे बोर्डला वाटते.अर्थात, त्या वादग्रस्त जागेशी शिया मुस्लिमांचा काडीमात्र संबंध नाही. ते ती जागा मंदिरासाठी देण्यास तयार कसे होतात, असे सुन्नी मुस्लिमांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिया वक्फ बोर्डाने काही म्हटले, तरी हा वाद सहजासहजी मिटण्याची शक्यता नाही.मी सरकारी हस्तक नाही-श्री श्री रविशंकरचंदीगड : अयोध्येतील रामजन्मभूमी वादातील मध्यस्थीत ‘सरकारचे हस्तक’ असल्याचा काँग्रेसने केलेला आरोप अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी फेटाळला. मी नेहमीच स्वत: काम केले आहे. मी कोणाच्याही सांगण्यावरून काम करीत नाही, असे ते सोमवारी वार्ताहरांशी येथे बोलताना म्हणाले. अयोध्या प्रश्नावर तुमची भूमिका काय, असे विचारले असता ते म्हणाले, मी जर एखादी भूमिका घेतली, तर मी मध्यस्थी कशी करू शकेन? संवाद साधून सर्व संबंधितांना एकत्र आणून तोडगा शोधता येईल का? याकडे मी बघेन. सरकारच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व रविशंकर करीत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी म्हटले होते. रामजन्मभूमीचा वाद न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी मध्यस्थीची तयारी रविशंकर यांनी दाखविल्याचे वृत्त होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर