शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांचा प्रचार ठरला आत्मघातकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:44 IST

राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली.

>दिलीप फडकेराहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली. आणि असे होणे मोदींच्या फायद्यात जाणारे होते.यावेळची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक मानावी लागेल. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी विजयश्री खेचून आणली आहे. मोदींवरच्या टीकेला मतदारांनीच तडाखेबंद उत्तर दिले आहे.शेतकरी, युवक यासारख्या समाजघटकांमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे निश्चित. जीएसटी, नोटाबंदी यासारखे प्रश्नही आहेतच. त्या प्रश्नांमुळे जनतेत नाराजीदेखील आहे; पण त्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता आपोआप सिद्ध होत नाही. त्यामुळे या नाराजीचा निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही हे लक्षणीय आहे. असे कसे झाले हे समजावून घेतले तर या निवडणुकीचा खरा अन्वयार्थ समजावून घेता येईल. पाच वर्षांपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले तेव्हापासूनच मोदींचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट निर्माण झाले होते. पारंपरिक राजकारणाच्या चौकटीत विचार करणाºया अनेकांना मोदी हा फिनॉमिनन समजू शकलेला नाही असे मला वाटते. स्वत:चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसणारा, दिवसाचे वीस तास काम करणारा आणि जागतिक स्तरावर नवीन असूनदेखील आपला ठसा जागतिक पटलावर उमटवणारा हा नेता जनसामान्यांना सुरुवातीपासूनच भावला आहे, हे पारंपरिक विचारांच्या लोकांना समजूच शकलेले नाही.निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणाºया तंत्रात वाकबगार असणारे आणि त्यांच्या यशस्वितेसाठी लागणारे संघटनेचे भक्कम जाळे उभारण्याचे कौशल्य असणारे अमित शहांसारखे सहकारी मोदींकडे आहेत. त्यामुळे त्यांना विजय मिळवणे शक्य होते. पण आजच्या विजयाला मोदींप्रमाणेच विरोधी पक्षांची आत्मघातकी धोरणेदेखील तितकीच कारणीभूत आहेत हेदेखील नजरेआड करता येणार नाही. जी लवचीकता मोदी-शहा यांनी नितीशकुमार किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी युती कायम करताना दाखवली ती जर राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीशी किंवा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुजन विकास किंवा मनसेच्या संदर्भात दाखवली असती तर काही प्रमाणात चित्र वेगळे दिसले असते. केवळ लोकांसमोर स्टेजवर हातात हात घालून उभे राहण्याने निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी लागणारे सहकार्याचे वातावरण तयार होत नाही. त्यासाठी ते सहकार्य प्रत्यक्ष व्यवहारात दाखवावे लागते. राहुल आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली. आणि साहजिकच हे असे होणे मोदींच्या फायद्यात जाणारे होते. तब्बल सात चरणांत प्रदीर्घ काळासाठी चालणाºया प्रचारात प्रसंगानुसार आपला संदेश बदलण्याची व्यूहरचना मोदींनी वापरली. त्यांच्यासमोर विरोधक अधिकाधिक हास्यास्पद होत गेले. बालाकोटच्या हल्ल्यानंतर या हल्ल्याच्या सत्यतेबद्दल निरर्थक शंका घेताना विरोधी पक्षीयांनी आपल्या बेवकूफपणाचे जे प्रदर्शन केले ते जनसामान्यांना चीड निर्माण करणारे ठरले. एकूणच जनतेच्या मनाचा अंदाज आपल्याच कल्पनांच्या जगात वावरणाºया उल्लूमशाल नेत्यांना आला नाही. मोदीविरोधाचे चश्मे लावलेल्या तथाकथित निष्पक्ष पत्रकारांनादेखील तो आला नाही. या निवडणुकीत मोदी नुसते जिंकलेच आहेत असे नाही, तर निर्णायक पद्धतीने त्यांनी विजय मिळवला. त्याचा अन्वयार्थ खूप विचारपूर्वक समजावून घ्यावा लागेल हे नक्की.(राजकीय विश्लेषक)