शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

उन्हाळ्यामुळे प्रचारात वाढली टोप्या, छत्र्या, गमछांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 04:20 IST

गांधी टोपी लोकप्रिय; सर्वच पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा वापर

नवी दिल्ली/कोइम्बतूर : एके काळी देशात गांधी टोपीची क्रेझ होती. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या डोक्यावर ती टोपी असायची. पण ती राजकारण्यांची नव्हे, तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची टोपी बनून गेली. महाराष्ट्रातील वारकरी, शेतकरी तीच टोपी रोज वापरू लागले. गुजरातमधील सामान्य लोक आणि व्यापारी यांनाही गांधी टोपी भावली. खादीचा वापर कमी झाला, तरी गांधी टोपी कायम राहिली.काळाच्या ओघात गांधी टोपीचा वापर कमीकमी होत गेला. मात्र यंदाच्या निवडणुकांत गांधी टोपीचा वापर पुन्हा खूपच वाढला असल्याचे दिसत आहे. अर्थात, गांधी टोपी पुन्हा लोकप्रिय होण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २0११ साली दिल्लीत केलेल्या आंदोलनाला दिले जाते. त्या काळात दिल्लीच्या गांधी मैदानावर व संपूर्ण शहरात हजारो लोकांच्या डोक्यावर ‘मै भी अण्णा’ असा मजकूर असलेल्या गांधी टोप्या दिसू लागल्या.नंतर दिल्लीत आम आदमी पक्षाने तर गांधी टोपी आपलीशी केली आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, खा. संजय सिंग यांच्यापासून आम आदमी पक्षाचे सारेच नेते व कार्यकर्ते यांच्या डोक्यावर गांधी टोपी आली. अर्थात त्या गांधी टोपीवर आम आदमी पार्टी व त्यांचे निवडणूक चिन्ह खराटा (झाडू) छापलेले असते. आजही दिल्लीतील आपचे कार्यकर्ते व नेते त्या टोप्या घालूनच प्रचार करताना दिसत आहे. शिवाय कडक उन्हाळ्यात या टोपीमुळे डोक्याचेही संरक्षण होत आहे.पण आम आदमी पार्टीच नव्हे, तर यंदा काँग्रेसचीही वेगळी गांधी टोपी आली आहे. ती पूर्वीप्रमाणे पांढरी शुभ्र नसून, तिरंगी आहे. त्यावर हात हे निवडणूक चिन्हही आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव व अखिलेश यादव कायम लाल रंगाची टोपी डोक्यावर परिधान करतात. पण निवडणुकीसाठी आलेल्या लाल टोपीवर सायकल हे निवडणूक चिन्ह आहे. अलीकडील काळात महात्मा गांधी यांचे उघडपणे कौतुक करणाºया भाजपचीही गांधी टोपी आहे. संपूर्ण उत्तर भारतात तसेच गुजरात व महाराष्ट्रात उन्हाळा सुरू होताच, पुरुष मंडळी डोक्याला पंचा (गमछा) बांधून बाहेर पडतात. निवडणुका उन्हाळ्यातच आल्याने राजकीय गमछेही बाजारात आले आहेत.फेंड्ट हॅटलाही मागणीगांधी टोपीप्रमाणेच फेंड्ट हॅटचीही मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तृणमूल काँग्रेस या पक्षांकडून या हॅटसाठी अधिक मागणी आहे, असे दिल्ली व कोलकातामधील व्यापाºयांनी सांगितले. तामिळनाडूतील कोइम्बतूरमधील खादी भांडारात प्रत्येक निवडणुकीतच विविध राजकीय पक्षांसाठी गांधी टोप्या बनवण्यात येतात. खादी भांडारातील राजकीय गांधी टोपी सुमारे पाच रुपयांना मिळते, तर दिल्ली, अलाहाबादमधील व्यापारी ती टोपी अवघ्या अडीच रुपयांत विकतात. अर्थात, खादी भांडारातील गांधी टोपीचे कापड जास्त चांगले असते. अर्थात, या टोप्या निवडणुकांपुरत्याच असल्याने त्यासाठी चांगल्या कापडाची गरज काय, असे व्यापारी विचारतात.रोजगार नाही म्हणून...केरळ व तामिळनाडूमध्ये उन्हाळ्यात बाहेर पडताना महिला हमखास छत्री घेतात. त्यामुळे यंदा निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय छत्र्याही विक्रीला आल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट व द्रमुक या पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांसाठी त्या खास बनवून घेण्यात आल्याचे कोइम्बतूर व कोचीमधील व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक