शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

देशातील 8 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचं वचन, प्रत्यक्षात 2 कोटींनाच दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 09:28 IST

केंद्र सरकारने 8 लाख मेट्रीक टन खाद्यान्नाची व्यवस्था केली होती, मात्र, राज्यांनी केवळ 6.39 मेट्रीक टनच धान्य घेतले.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने 8 लाख मेट्रीक टन खाद्यान्नाची व्यवस्था केली होती, मात्र, राज्यांनी केवळ 6.39 मेट्रीक टनच धान्य घेतले. 8 कोटी नागरिकांना धान्य देण्याचं वचन देण्यात आलं, पण दोन महिन्यात पुरवठा केवळ 2 कोटी लोकांनाच करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊन काळात देशातील 8 कोटी स्थलांतरीत मजुरांच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी केंद्र सरकारने दरमहा 5 किलो धान्य देण्याच्या हेतुने आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत केवळ 1.20 कोटी लोकांपर्यंतच हे मोफतचे धान्य पोहोचले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात या लाभार्थ्यांची संख्या 89.88 लाखापर्यंत पोहोचली आहे. 

केंद्र सरकारने 8 लाख मेट्रीक टन खाद्यान्नाची व्यवस्था केली होती, मात्र, राज्यांनी केवळ 6.39 मेट्रीक टनच धान्य घेतले. त्यापैकी मे आणि जून महिन्यात केवळ 99,207 मेट्रीक टन धान्यचं लोकांना वाटण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 1.96 कोटी कुटुंबापैकी प्रत्येक कुटुंबाला एक-एक किलो दाळही देण्यात येत होती. त्यासाठी सरकारने 39,000 मेट्रीक टन डाळीचीही व्यवस्था केली होती. राज्यांनी या डाळीपैकी केवळ 31,868 मेट्रीक टन डाळ घेतली आहे. मात्र, लोकांना आत्तापर्यंत 4,702 मेट्रीक टन डाळ देण्यात आली आहे. 

केंद्र सरकाने धान्य वाटपासाठी 3109 कोटी आणि डाळ वाटपासाठी 280 कोटी रुपयांच संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय खाद्य निगमच्या 28 जूनच्या आकडेवाडीनुसार 816.60 मेट्रीक टन खाद्यान्न शिल्लक आहे. त्यापैकी 266.29 लाक मेट्रीक टन तांदूळ आणि 550.31 लाख मेट्रीक टन गव्हाचे भंडार आहे. यंदाच्या वर्षीच्या उत्पादनाशिवाय हा धान्यसाठा आहे. 

पुढील एका महिन्यातील विविध कल्याणकारी योजनांसाठी जवळपास 55 लाख मेट्रीक टन धान्याची आवश्यकता असणार आहे. मात्र, अन्न व नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दावा केला आहे की, 8 कोटी मजुरांसाठी सर्वच राज्यांनी मे आणि जून महिन्यातील वितरणासाठी धान्य व डाळ घेतली आहे. तसेच या धान्याचे वितरणही चालू करण्यात आले आहे. 

अन्न सुरक्षा कायद्याच्या अखत्यारित न येणाऱ्या मजूर व स्थलांतरीतांनाही 5 किलो मोफत धान्य देण्याची योजना सरकारने लॉकडाऊन काळात सुरु केली होती. म्हणजेच, देशातील 8 कोटी नागरिकांना रेशन कार्डशिवाय हे धान्य देण्यात येणार होते. मात्र, 8 कोटी नागरिकांना धान्य देण्याचं वचन देण्यात आलं, पण दोन महिन्यात पुरवठा केवळ 2 कोटी लोकांनाच करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न