शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अमेठी, रायबरेलीतील प्रकल्प बंद पाडले जातात

By admin | Published: August 05, 2016 4:23 AM

लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला

नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला. तथापि, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात विजय मिळविला होता. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे तर उपाध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. शुन्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे प्रमोद तिवारी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने या मतदारसंघांतील प्रकल्पांवर वरवंटा फिरविला जात आहे. यापूर्वी जगदीशपुर येथील हिंदुस्तान पेपर मील आणि डिस्कव्हरी पार्कला टाळे ठोकण्यात आले होते तसेच फुड पार्क प्रकल्पही रोखण्यात आला होता. आता राजीव गांधी इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ इन्फॉर्मेशनची अमेठीतील शाखा बंद करण्यात आली आहे. राजकारणाचा हा किळसवाणा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघातील प्रकल्प बंद करून तुम्ही त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचा सूड घेत आहात, असे तिवारी म्हणाले. काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणारा भाजप आता जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या संस्थाही बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला. तुम्ही कितीही प्रयत्न करा. मात्र, इतिहासातील त्यांच्या त्यागाचे संदर्भ तुम्ही वगळू शकणार नाहीत. इतिहास जेव्हा वाचला जाईल तेव्हा तुम्ही खलनायक म्हणूनच लोकांच्या समोर याल,असेही ते म्हणाले. तिवारी यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसचे राजीव शुक्ला म्हणाले की, हे सरकार सुडाच्या भुमिकेतून काम करीत असल्याचे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोणीही सूडभावना ठेवू नये...विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या संख्येने प्रकल्प बंद करण्यात आले असतील तर असे का हा विचार आमच्या मनात डोकावणारच. सरकारला टोला लगावताना आझाद यांनी ‘चेटकीनीही काही घरे सोडतात’ ही म्हण उद्धृत केली. दोन पक्षांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, कोणीही सूडभावना ठेवू नये, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना नायडू म्हणाले की, कोणाचाही सूड घेण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो. फुड पार्क प्रकल्प संपुआ सरकारच्यात काळात बंद करण्यात आला. इतर प्रकल्पांचे मुद्दे मी संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना त्याची कारणे आणि पार्श्वभुमि विचारेन, असे ते म्हणाले.