शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

अमेठी, रायबरेलीतील प्रकल्प बंद पाडले जातात

By admin | Updated: August 5, 2016 04:23 IST

लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला

नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला. तथापि, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात विजय मिळविला होता. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे तर उपाध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. शुन्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे प्रमोद तिवारी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने या मतदारसंघांतील प्रकल्पांवर वरवंटा फिरविला जात आहे. यापूर्वी जगदीशपुर येथील हिंदुस्तान पेपर मील आणि डिस्कव्हरी पार्कला टाळे ठोकण्यात आले होते तसेच फुड पार्क प्रकल्पही रोखण्यात आला होता. आता राजीव गांधी इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ इन्फॉर्मेशनची अमेठीतील शाखा बंद करण्यात आली आहे. राजकारणाचा हा किळसवाणा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघातील प्रकल्प बंद करून तुम्ही त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचा सूड घेत आहात, असे तिवारी म्हणाले. काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणारा भाजप आता जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या संस्थाही बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला. तुम्ही कितीही प्रयत्न करा. मात्र, इतिहासातील त्यांच्या त्यागाचे संदर्भ तुम्ही वगळू शकणार नाहीत. इतिहास जेव्हा वाचला जाईल तेव्हा तुम्ही खलनायक म्हणूनच लोकांच्या समोर याल,असेही ते म्हणाले. तिवारी यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसचे राजीव शुक्ला म्हणाले की, हे सरकार सुडाच्या भुमिकेतून काम करीत असल्याचे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोणीही सूडभावना ठेवू नये...विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या संख्येने प्रकल्प बंद करण्यात आले असतील तर असे का हा विचार आमच्या मनात डोकावणारच. सरकारला टोला लगावताना आझाद यांनी ‘चेटकीनीही काही घरे सोडतात’ ही म्हण उद्धृत केली. दोन पक्षांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, कोणीही सूडभावना ठेवू नये, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना नायडू म्हणाले की, कोणाचाही सूड घेण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो. फुड पार्क प्रकल्प संपुआ सरकारच्यात काळात बंद करण्यात आला. इतर प्रकल्पांचे मुद्दे मी संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना त्याची कारणे आणि पार्श्वभुमि विचारेन, असे ते म्हणाले.