शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य मुख्यमंत्र्यांचे प्रोजेक्शन असे बारगळले..!

By admin | Updated: July 17, 2014 00:42 IST

मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, मग दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवू असा चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजपाच्या कोअर समितीसह प्रमुख पदाधिकाऱ्याशी मंगळवारी शहा यांनी राज्याच्या स्थितीबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री पदाचे नाव तुर्तास बारगळल्याने, जागा वाढविण्यासाठी हमखास विजयी होऊ शकणाऱ्या भाजपाच्या काही आमदारांना तयार राहण्याचे संकेत शहा यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्यात वातावरण मोदीमय असल्याने भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तर पक्ष सत्तेत येऊ शकेल, ही प्रमुख शक्यता पडताळून पाहायची का, असे शहा यांना सांगण्यात आले. असे झाल्यास मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून लाभ घेता येईल, असेही त्यांना आडून सुचविले गेले. मात्र सत्तेत यायचे असेल तर या शक्यतांवर विचार करू नका, अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करा. ज्यांचे आमदार अधिक असतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल असे आधीच ठरल्याचे शहा यांनी सांगितले. त्यामुळे वाटाघाटीत जागा शिवसेनेच्या पदरात अधिक गेल्या तरी, विजयी किती होतील, यावरच मुख्यमंत्रीपदाचे नाव अवलंबून आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने ११९ जागा लढविल्या, पैकी ४७ जिंकल्या. शिवसेनेने १६० जागा लढविल्या, पैकी ४५ जिंकल्या. यावेळी भाजपा १२५-१३० जागा मागणार आहे. तर शिवसेनेला १६० जागांवरून १४५ जागांपर्यंत मागे आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. १७ ते २० जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठेवली जात आहे. पण शिवसेना जागा सोडेल का, याप्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेच नाही. प्रमोद महाजन असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेने बळकावला, तर गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बोलणी सुरू असताना गुहागर विधानसभा मतदारसंघ ओढून घेतला, त्यामुळे वाटाघाटीच्या यावेळच्या चर्चेत जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा नेते शिवसेनेवर उलटणारे अनेक मुद्दे भात्यात भरून नेणार आहेत. शहा यांना सांगण्यात आले, की शिवसेनाकडे ओढा असलेल्या रामदास आठवले यांना राज्यसभा बहाल करताना भाजपाने मदत केली, त्यामुळे राजू शेट्टी यांना भाजपा, तर आठवले व जानकर या मित्रांना शिवसेनेने आपल्या वाट्याच्या जागा द्याव्या, दोन्ही पक्ष ज्या जागा कधीच जिंकू शकले नाहीत, त्या जागांवर यावेळी भाजपाने दावा करावा. त्यामुळे जागांच्या वाटाघाटीत शिवसेना पुढे राहणार असली, तरी प्रत्यक्षात भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त विजयी करण्याचे धोरण असणार आहे. ————