शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘मोदी केअर’च्या मार्गात अडचणी ; विमा कंपन्यांशी कराराची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:20 IST

तब्बल ५० कोटी लोकांना आरोग्य विम्याची सेवा देणारी महत्त्वाकांक्षी ‘मोदी केअर’ योजना अनंत अडचणींचा सामना करीत आहे.

नवी दिल्ली : तब्बल ५० कोटी लोकांना आरोग्य विम्याची सेवा देणारी महत्त्वाकांक्षी ‘मोदी केअर’ योजना अनंत अडचणींचा सामना करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी रुग्णालये आणि विमा कंपन्या यांच्याशी करार करण्याची घाई करण्यात येत आहे.ही योजना इतकी मोठी आहे की, संपूर्ण दक्षिण अमेरिकेच्या लोकसंख्येएवढ्या लोकांना मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे. योजनेची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत. तथापि, रुग्णालये आणि विमा कंपन्यांशी कराराचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील भाषणातून करण्याची पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. त्याआधी हे सारे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. देशाच्या लोकसंख्येपैकी ४० टक्के गरिबांना या योजनेत आरोग्य विम्याचे संरक्षण पुरविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१७च्या अहवालानुसार भारतातील ५२ दशलक्ष जनतेच्या आरोग्य सेवेवरील खर्च दारिद्र्यरेषेखाली आहे.मोदी सरकारची या वर्षातील ही दुसरी मोठी कल्याणकारी योजना आहे. याआधी सरकारने ५०० दशलक्ष गरीब कामगारांना सामाजिक सुरक्षा कार्यक्रमात सामावून घेतले होते. मोदी केअर योजनेत प्रत्येक गरीब कुटुंबास वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. याआधीची अशीच एक केंद्रीय आरोग्य विमा योजना फारशी यशस्वी ठरलेली नाही. पण १० वर्षांत पात्र लाभार्थ्यांपैकी ६१ टक्के लोकांपर्यंतच या योजनेचे लाभ पोहोचू शकले.कंपन्या व रुग्णालयेच ठरली नाहीतमोदी केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी सांगितले, योजनेचे लाभार्थी निश्चित झाले आहेत.आयटी व्यवस्था तयार आहे. योजनेत सहभागी होणारी खासगी व सरकारी रुग्णालये आणि विमा कंपन्या मात्र अजून ठरलेल्या नाहीत. खासगी क्षेत्राच्या मदतीशिवाय इतक्या मोठ्या संख्येतील लोकांना आरोग्यसेवा पुरविणे शक्य नाही.एवढी क्षमता सरकारी क्षेत्रात नाही. ही योजना येत्या स्वातंत्र्य दिनी, १५ आॅगस्टला तयार असेल, अशी आशा आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल