शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Narendra Modi: तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप; मोदी म्हणाले...सरकारचं कौतुकच व्हायला हवं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:39 IST

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली-

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विचारण्यात आलं असता मोदींनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. देशात निवडणुका निर्धारित वेळेनुसार होत असतात आणि तपास यंत्रणा देखील त्यांच्या नियम व कायद्यानुसारच काम करत असतात. भ्रष्टाचारामुळे देशाचं खूप नुकसान झालं आहे आणि जर भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करून देशाच्या संपत्तीत भर पडत असेल तर उलट याबाबत केंद्र सरकारचं कौतुकच केलं गेलं पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम नियम व कायद्यानुसार करत असतात. त्यात केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. "भ्रष्टाचाराची वाळवी देशाला पोखरून काढत आहे. भ्रष्टाचाराविरोधात जनतेनं आवाज उठवला नव्हता का? मी जर जनतेनं उठवलेल्या आवाजासाठी काहीच केलं नाही तर मला जनता माफ करेल का? ज्या ज्या वेळी सरकारला भ्रष्टाचाराविषयीची माहिती मिळते तेव्हा मग कारवाई करायची नाही का? आणि जर भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करुन कोट्यवधी रुपये देशाच्या तिजोरीत जमा होत असतील तर खरंतर सरकारचं कौतुकच करायला हवं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

"निवडणुका देशात होत असतात मग अशावेळी काय सरकार काम करणं बंद करतं का? निवडणुका पाच वर्षातून एकदाच होत असतात आणि त्यास सर्व पक्ष एकत्रितरित्या सामोरं जातात. सर्व राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीला एकत्रं सामोरं जातात. त्यामुळे अशावेळी ईडी आणि सीबीआयचा मुद्दा राजकारणाचा विषय ठरू शकत नाही. तपास यंत्रणा त्यांच्या टाइमटेबल नुसार काम करत असतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे ते काम करत असतात. यात केंद्राचा कोणताही सहभाग नसतो", असंही मोदींनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२