शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Narendra Modi: तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप; मोदी म्हणाले...सरकारचं कौतुकच व्हायला हवं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:39 IST

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली-

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विचारण्यात आलं असता मोदींनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. देशात निवडणुका निर्धारित वेळेनुसार होत असतात आणि तपास यंत्रणा देखील त्यांच्या नियम व कायद्यानुसारच काम करत असतात. भ्रष्टाचारामुळे देशाचं खूप नुकसान झालं आहे आणि जर भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करून देशाच्या संपत्तीत भर पडत असेल तर उलट याबाबत केंद्र सरकारचं कौतुकच केलं गेलं पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम नियम व कायद्यानुसार करत असतात. त्यात केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. "भ्रष्टाचाराची वाळवी देशाला पोखरून काढत आहे. भ्रष्टाचाराविरोधात जनतेनं आवाज उठवला नव्हता का? मी जर जनतेनं उठवलेल्या आवाजासाठी काहीच केलं नाही तर मला जनता माफ करेल का? ज्या ज्या वेळी सरकारला भ्रष्टाचाराविषयीची माहिती मिळते तेव्हा मग कारवाई करायची नाही का? आणि जर भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करुन कोट्यवधी रुपये देशाच्या तिजोरीत जमा होत असतील तर खरंतर सरकारचं कौतुकच करायला हवं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

"निवडणुका देशात होत असतात मग अशावेळी काय सरकार काम करणं बंद करतं का? निवडणुका पाच वर्षातून एकदाच होत असतात आणि त्यास सर्व पक्ष एकत्रितरित्या सामोरं जातात. सर्व राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीला एकत्रं सामोरं जातात. त्यामुळे अशावेळी ईडी आणि सीबीआयचा मुद्दा राजकारणाचा विषय ठरू शकत नाही. तपास यंत्रणा त्यांच्या टाइमटेबल नुसार काम करत असतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे ते काम करत असतात. यात केंद्राचा कोणताही सहभाग नसतो", असंही मोदींनी म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२