शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इंदिरा गांधींच्या पावलांवर प्रियांका यांचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:18 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलांवर पाऊल टाकत कॉँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलांवर पाऊल टाकत कॉँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेल्या पक्षामध्ये चैतन्य निर्माण केले. दहा आदिवासींच्या खुनाच्या घटनेमुळे सोनभद्र येथे पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियांका जात होत्या. मुख्यमंत्री योगी सरकारच्या सुचनेवरुन प्रशासनाने त्यांना नारायणपूर पोलीस ठाण्याच रोखले. त्यावेळी प्रियांका यांनी तेथेच रस्त्यावर धरणे धरले. नंतर त्यांना चुनार गेस्ट हाऊस येथे नेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले. सोनभद्र येथे जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण कॉँग्रेस सक्रीय झाली. पक्षाचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी देशभरातील पक्ष संघटनेला या विरोधात देशव्यापी धरणे देण्याच्या सूचना दिल्या.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही टिष्ट्वट करुन उत्तर प्रदेश सरकारची कारवाई चुकीची आहे, असे म्हटले आहे. प्रियांका यांना रोखण्याचे हे पाऊल अन्यायपूर्ण आणि लोकशाही विरोधी आहे. पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याचा आणित्यांच्या मागे उभे राहण्याचाविरोधी पक्ष नेत्यांना अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.योगी यांच्या आशिर्वादाने राज्यात संघटीत गुन्हेगारी वाढली आहे, असे पक्ष प्रवक्ता सूरजेवाला यांनी म्हटले असून महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिलेल्या एका उत्तराचा उल्लेख करत बलात्काराच्या घटनांपैकी ६९८७बलात्कार केवळ उत्तर प्रदेशात झाले आहेत, असे निदर्शनास आणले आहे.प्रियांका यांनी सोनभद्रयेथे जाण्याचा निर्णय अचानक घेतला. त्याची माहिती अन्य नेत्यांना नव्हती. कॉँग्रेस नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असताना प्रियांका गांधीयांनी निवडणूक निकालानंतर पूर्वांचलचा पहिला दौरा केला. आपल्या आजीच्या पाऊलखुणांवर चालत मृत कॉँग्रेसला संजीवनी देण्याचे काम केले.>प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रेउत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी यांना सांभाळण्यास सांगण्यात आले आहे.अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, बुधवारी अमेरिका भेटीवर रवाना होण्याआधी राहुल गांधी यांनी प्रियांका यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी घेण्यास सांगितले.अलीकडेच राहुल यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. राहुल २२-२३ जुलै रोजी परतणार असून, त्यानंतरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे समजते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी