शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

इंदिरा गांधींच्या पावलांवर प्रियांका यांचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:18 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलांवर पाऊल टाकत कॉँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलांवर पाऊल टाकत कॉँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेल्या पक्षामध्ये चैतन्य निर्माण केले. दहा आदिवासींच्या खुनाच्या घटनेमुळे सोनभद्र येथे पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियांका जात होत्या. मुख्यमंत्री योगी सरकारच्या सुचनेवरुन प्रशासनाने त्यांना नारायणपूर पोलीस ठाण्याच रोखले. त्यावेळी प्रियांका यांनी तेथेच रस्त्यावर धरणे धरले. नंतर त्यांना चुनार गेस्ट हाऊस येथे नेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले. सोनभद्र येथे जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण कॉँग्रेस सक्रीय झाली. पक्षाचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी देशभरातील पक्ष संघटनेला या विरोधात देशव्यापी धरणे देण्याच्या सूचना दिल्या.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही टिष्ट्वट करुन उत्तर प्रदेश सरकारची कारवाई चुकीची आहे, असे म्हटले आहे. प्रियांका यांना रोखण्याचे हे पाऊल अन्यायपूर्ण आणि लोकशाही विरोधी आहे. पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याचा आणित्यांच्या मागे उभे राहण्याचाविरोधी पक्ष नेत्यांना अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.योगी यांच्या आशिर्वादाने राज्यात संघटीत गुन्हेगारी वाढली आहे, असे पक्ष प्रवक्ता सूरजेवाला यांनी म्हटले असून महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिलेल्या एका उत्तराचा उल्लेख करत बलात्काराच्या घटनांपैकी ६९८७बलात्कार केवळ उत्तर प्रदेशात झाले आहेत, असे निदर्शनास आणले आहे.प्रियांका यांनी सोनभद्रयेथे जाण्याचा निर्णय अचानक घेतला. त्याची माहिती अन्य नेत्यांना नव्हती. कॉँग्रेस नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असताना प्रियांका गांधीयांनी निवडणूक निकालानंतर पूर्वांचलचा पहिला दौरा केला. आपल्या आजीच्या पाऊलखुणांवर चालत मृत कॉँग्रेसला संजीवनी देण्याचे काम केले.>प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रेउत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी यांना सांभाळण्यास सांगण्यात आले आहे.अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, बुधवारी अमेरिका भेटीवर रवाना होण्याआधी राहुल गांधी यांनी प्रियांका यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी घेण्यास सांगितले.अलीकडेच राहुल यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. राहुल २२-२३ जुलै रोजी परतणार असून, त्यानंतरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे समजते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी