शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानाच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर; प्रियंका गांधींचं मदतीचं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 10:22 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झालेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळेस प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देशहीद जवानाच्या मुलीला प्रियंका गांधींनी दिली मदतीचे आश्वासनईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यास मदत करेन - प्रियंका गांधी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधीलपुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झालेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळेस प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. उन्नावमधील काँग्रेसच्या माजी खासदार  अन्नू टंडन यांनी ईशाचा संपर्क प्रियंका गांधींसोबत संवाद घडवून आणण्यास मदत केली.  प्रियंका गांधींनी फोनवरुन ईशाला भविष्यात काय करायचे आहे? असे विचारले. त्यावर तिनं डॉक्टर  बनून जनतेची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर प्रियंका गांधींनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यास पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.

14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीदपुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीर