शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 15:28 IST

पीडित कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांमध्ये भीती उरली नसून ते खुलेआम फिरत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबावर वर्षभरापासून अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. मात्र आरोपीचे कुटुंब भाजपशी निगडीत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

शनिवारी प्रियंका गांधी यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची उन्नाव येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, पीडित कुटुंबाशी मी चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले असून, खूप वाईट घटना घडली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबावर वर्षभर अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली.  कुटुंबातील महिलांना धमकावल्याचा आरोप प्रियंका गांधीनी केला.

 कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली. अशा प्रकारे कुटुंबाचा छळ होत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी लावला. तर हे सर्व कसे घडत आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा. तसेच योगी सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर ट्विटर हैंडलवरून ट्वीट करत योगी सरकारवर टीका केली आहे. या दुःखाच्या घटनेत पीडितेच्या कुटूंबाला धीर देण्याची मी देवाकडे प्रार्थना करते. त्यांना न्याय न मिळणे हे आपल्या सर्वांचे अपयश आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्व दोषी आहोत. मात्र हे सर्व उत्तर प्रदेशमधील पोकळ झालेली कायदा व सुव्यवस्था देखील दर्शवते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

आरोपीचे कुटुंब भाजपशी संबंधित

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी हा गावच्या प्रमुखांचा मुलगा आहे. असे म्हटले जात आहे की त्याचे कुटुंब भाजपशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले जात आहे का ? कारण या आधी सुद्धा असे झाले असल्याचे प्रियंका म्हणाल्या. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप तर होत नाही ना ? याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आरोपींना कोणतेही भीती नसून ते पीडित कुटंबाला सतत धमकावत असल्याचे सुद्धा प्रियंका गांधी म्हणाल्या.