शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 15:28 IST

पीडित कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांमध्ये भीती उरली नसून ते खुलेआम फिरत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबावर वर्षभरापासून अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. मात्र आरोपीचे कुटुंब भाजपशी निगडीत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

शनिवारी प्रियंका गांधी यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची उन्नाव येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, पीडित कुटुंबाशी मी चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले असून, खूप वाईट घटना घडली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबावर वर्षभर अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली.  कुटुंबातील महिलांना धमकावल्याचा आरोप प्रियंका गांधीनी केला.

 कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली. अशा प्रकारे कुटुंबाचा छळ होत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी लावला. तर हे सर्व कसे घडत आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा. तसेच योगी सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर ट्विटर हैंडलवरून ट्वीट करत योगी सरकारवर टीका केली आहे. या दुःखाच्या घटनेत पीडितेच्या कुटूंबाला धीर देण्याची मी देवाकडे प्रार्थना करते. त्यांना न्याय न मिळणे हे आपल्या सर्वांचे अपयश आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्व दोषी आहोत. मात्र हे सर्व उत्तर प्रदेशमधील पोकळ झालेली कायदा व सुव्यवस्था देखील दर्शवते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

आरोपीचे कुटुंब भाजपशी संबंधित

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी हा गावच्या प्रमुखांचा मुलगा आहे. असे म्हटले जात आहे की त्याचे कुटुंब भाजपशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले जात आहे का ? कारण या आधी सुद्धा असे झाले असल्याचे प्रियंका म्हणाल्या. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप तर होत नाही ना ? याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आरोपींना कोणतेही भीती नसून ते पीडित कुटंबाला सतत धमकावत असल्याचे सुद्धा प्रियंका गांधी म्हणाल्या.