शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

जीडीपीवरून प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:52 IST

सरकार खोटी आश्वासने देत असून, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप केला

नवी दिल्ली : विकासाच्या घटत्या दरावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी भाजप सरकारवर हल्ला केला. हे सरकार खोटी आश्वासने देत असून, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप केला. भारताच्या आर्थिक वाढीचा दर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आणखी घसरून ४.५ टक्क्यांवर आला. गेल्या सहा वर्षांतील हा नीचांक आहे, असे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

आश्वासनांमागून आश्वासने, दरवर्षी दोन कोटी रोजगारांची निर्मिती, शेतमालाला दुप्पट भाव, चांगले दिवस, मेक इन इंडिया, अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची बनवण्याचे आश्वासन, या आश्वसानांना आज कार्य अर्थ उरला आहे? आज जीडीपीचा दर ४.५ टक्क्यांवर उतरला आहे व त्यातून दिसते हेच की, वरील सगळी आश्वासने खोटी आहेत, असे गांधी यांनी हिंदीत केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले.

भाजपने देशाला उद्ध्वस्त केले. भारताला विकासाची व त्याच्या अर्थव्यवस्थेला वाढीची इच्छा आहे; परंतु सरकारच्या अपयशामुळे तसे झालेले नाही, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या. टष्ट्वीटसोबत त्यांनी २६ तिमाहींतील सर्वात कमी जीडीपी अशा ओळी टाकून चित्रही दिले.शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी सध्याची अर्थव्यवस्था ही इशारा देणारी असून, आम्हा सगळ्यांना तिची काळजी वाटत आहे, असे म्हटले. रोजगार नसणे आणि वाढ होत नाही त्यातून बेरोजगारी वाढली आहे हीच परिस्थिती इशारा देणारी आहे, असे गुजराल म्हणाले.

जनता दलाचे (संयुक्त) नेते के.सी. त्यागी म्हणाले की, घटता विकास दर, सार्वजनिक उपक्रमांची मालमत्ता खासगी लोकांना विकणे आणि कृषी क्षेत्राला आलेली मरगळ व त्यामुळे खेड्यांतून शहरांत येत असलेला बेरोजगार याबद्दल आमचा पक्ष चिंतेत आहे.सरकारने अर्थतज्ज्ञ किंवा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासारख्यांशी या विषयावर चर्चा केली पाहिजे. हा संघर्षाचा विषय नाही, तर चर्चाविनिमयाचा असल्याचे त्यागी म्हणाले.भाजपच्या मित्रपक्षांना चिंताआर्थिक वर्ष २०१९-२०२० च्या दुसºया तिमाहीत विकास दर फारच खाली आल्यानंतर भाजपच्या मित्रपक्षांपैकी एकाने सरकारमध्ये ‘बुद्धीची तूट’ असल्याकडे लक्ष वेधले, तर दुसºया पक्षाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने तातडीने राजकीय नेते व अर्थतज्ज्ञांची बैठक घ्यावी, अशी सूचना केली. दरम्यान, भाजपचे नेते आर्थिक परिस्थितीवर जाहीरपणे भाष्य करणे टाळत आहेत.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी