शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

१५० गाड्या व ५० रेल्वे स्टेशनचेही खासगीकरण; नीती आयोगाने पाठविले रेल्वे मंडळाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:30 IST

देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील १५० रेल्वे गाड्या व ५० रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यासाठी सर्वाधिकार कृती दल स्थापन करण्याचे निर्देश रेल्वे मंडळाला दिले आहेत.

नवी दिल्ली : देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील १५० रेल्वे गाड्या व ५० रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यासाठी सर्वाधिकार कृती दल स्थापन करण्याचे निर्देश रेल्वे मंडळाला दिले आहेत.नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वाधिकार कृती दल स्थापन करून कालावधी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या दलामध्ये नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, व्ही. के. यादव यांच्यासह अर्थ, गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव सदस्य राहणार आहेत. रेल्वे मंडळाने देशातील ४०० स्टेशनना जागतिक दर्जा देण्याचे लक्ष्य होते. परंतु फारच थोडी स्टेशन विकसित करण्यात यश मिळाल्याचे कांत यांनी म्हटले.यासंदर्भात अमिताभ कांत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. रेल्वेच्या खासगीकरणाला वेग देऊन ५० स्टेशनचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया प्राधान्याने करण्याचे निर्देश गोयल यांनी दिले आहेत. काही दिवसांमध्ये सहा विमानतळांचे खासगीकरण करणाचा अनुभव लक्षात घेता रेल्वे स्टेशनचे खासगीकरण करण्यासाठी तीच प्रक्रिया अवलंबावी, असेही या पत्रात सुचविले आहे. पहिल्या टप्प्यात १५० रेल्वे गाड्यांचे खासगीकरण केले जाईल. पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस लखनऊ-दिल्ली गेल्या ४ आॅक्टोबरला सुरू झाली. यात प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.कृती दल करेल शिफारसकोणत्या रेल्वेगाड्या व कोणत्या स्टेशनांचे खासगीकरण करावे, याबाबत कृती दल शिफारस करेल आणि त्याआधारे निर्णय घेण्यात येईल. सध्या कोणत्याही गाड्या वा स्टेशनांबाबत निर्णय झालेला नाही.

टॅग्स :railwayरेल्वे