शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खासगी बँकांमध्ये या वर्षी होणार मोठी कर्मचारी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:02 IST

प्लेसमेंट कंपन्यांद्वारे निवड; एक लाख रोजगार

नवी दिल्ली: आर्थिक मंदीचे सावट असतानाही कोटक महिंद्र, एचडीएफसी, अ‍ॅक्सिससह आरबीएल देशातील सहा बँकांमध्ये येत्या वर्षांत मोठी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. नव्या आर्थिक वर्षांत या बँकांमध्ये सुमारे १ लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, असे टीमलीज या प्लेसमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले.अजय शहा यांनी सांगितले की, खासगी बँकांनी आता रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांना शाखा वाढविणे आणि त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे ठरेल. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा नव्या वर्षात ३० टक्के अधिक कर्मचाºयांची भरती अपेक्षित आहे. त्यात अगदी नवे आणि काही अनुभवी लोकांना रोजगार मिळेल.अनुभव नसलेल्यांना किमान १८ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकेल आणि अनुभवी तसेच विशेष कौशल्य असलेल्यांना एक लाख रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळेल. पदवीधर, पदव्युत्तर तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी आणि अनुभव असलेल्यांना कर्मचारी भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. काही पदे उच्च श्रेणीतीलही असतील.या बँकांत अधिक नोकऱ्याएचडीएफसी, अ‍ॅक्सिस व कोटक महिंद्र या तीन बँकांमध्ये मिळूनच सुमारे ७५ हजार लोकांना नोकºया मिळण्याची शक्यता असून, आरबीएल बँकेत सुमारे पाच हजार कर्मचाºयांची भरती होईल, असा अंदाज आहे.या बँकांतील भरती थेट होणार नसून, विविध प्लेसमेंट कंपन्यांमार्फत होणार आहे. त्यामुळे या भरतीची माहिती प्लेसमेंट कंपन्यांमार्फतच कळू शकेल.

टॅग्स :bankबँक