शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान योजनेद्वारे २६ प्रकल्प मार्गी लागणार

By admin | Updated: July 28, 2016 00:30 IST

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे देशातील ९९ पाटबंधारे प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय झाला असून, त्यात सर्वाधिक म्हणजे २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे देशातील ९९ पाटबंधारे प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय झाला असून, त्यात सर्वाधिक म्हणजे २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशभरातील रखडलेले हे सर्व प्रकल्प २0१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सिंचन निधी स्थापन करण्यात येणार असून, त्यात राज्ये तसेच केंद्र सरकार यांचा सहभाग असेल. नाबार्ड ही त्यासाठीही प्रमुख एजन्सी असेल आणि नाबार्डकडून राज्यांना ६ टक्के व्याजाने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जे घेणे शक्य होणार आहे. राज्यातील २६ प्रकल्पांचा या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश केल्याबद्दल भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नदीविकास मंत्री उमा भारती यांचे विशेष आभार मानले आहेत. खरे तर नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यामुळेच महाराष्ट्रातील इतक्या सिंचन प्रकल्पांचा या योजनेत समावेश झाला आहे.महाराष्ट्रातील जे २६ प्रकल्प डिसेंबर २0१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, ते पुढीलप्रमाणे. त्यासाठी केंद्र आणि राज्यांकडून मिळणाऱ्या निधीचा उल्लेख कंसामध्ये आहे. या सर्व प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यासाठी १९ हजार ६९४ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.वाघुर (४९४ कोटी), बावनथडी (१३0. ७१ कोटी), निम्न दुधना (५२१.९२ कोटी), तिल्लारी (३११.४६ कोटी), निम्न वर्धा (५९0.८४ कोटी), निम्न पांझरा (१३१.0६), नांदुर मधमेश्वर फेज दोन (३६0.४३), गोसीखुर्द (५६0६.८८ कोटी), उर्ध्व पेनगंगा (७४३.८९), बोनबाळा (१६५६. २३ कोटी), तारली (३६६. ३४), धोम बलाकवाडी (३८४. ३५ कोटी), अर्जुन (२७७. ३७), उर्ध्व कुंडलिका (१0६.0२ कोटी), अरुणा (२७७.३७ कोटी), गडनदी (२६६.३९), कृष्णा कोयना (१६४३.८९ कोटी), डोंगरगाव (२.५९ कोटी), सांगोला शाखा कालवा (६४२.६३ कोटी), खडकपूर्णा (२६९.0८ कोटी), वारणा (८३१.३३ कोटी), मोरणा-गुरेघर (१0९.0९ कोटी), निम्न पेढी (५४४.५१ कोटी), वांग (१00.४0 कोटी), नरडवे-महमदवाडी (८५.९२ कोटी) आणि कुडाळी (२५१. ४४ कोटी) सिंचन निधी स्थापन करणारसिंचन निधी स्थापन करून हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यात राज्ये तसेच केंद्र सरकार यांचा सहभाग असेल. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी १९ हजार ६९४ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.