शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान योजनेद्वारे २६ प्रकल्प मार्गी लागणार

By admin | Updated: July 28, 2016 00:30 IST

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे देशातील ९९ पाटबंधारे प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय झाला असून, त्यात सर्वाधिक म्हणजे २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे देशातील ९९ पाटबंधारे प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय झाला असून, त्यात सर्वाधिक म्हणजे २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशभरातील रखडलेले हे सर्व प्रकल्प २0१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सिंचन निधी स्थापन करण्यात येणार असून, त्यात राज्ये तसेच केंद्र सरकार यांचा सहभाग असेल. नाबार्ड ही त्यासाठीही प्रमुख एजन्सी असेल आणि नाबार्डकडून राज्यांना ६ टक्के व्याजाने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जे घेणे शक्य होणार आहे. राज्यातील २६ प्रकल्पांचा या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश केल्याबद्दल भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नदीविकास मंत्री उमा भारती यांचे विशेष आभार मानले आहेत. खरे तर नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यामुळेच महाराष्ट्रातील इतक्या सिंचन प्रकल्पांचा या योजनेत समावेश झाला आहे.महाराष्ट्रातील जे २६ प्रकल्प डिसेंबर २0१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, ते पुढीलप्रमाणे. त्यासाठी केंद्र आणि राज्यांकडून मिळणाऱ्या निधीचा उल्लेख कंसामध्ये आहे. या सर्व प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यासाठी १९ हजार ६९४ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.वाघुर (४९४ कोटी), बावनथडी (१३0. ७१ कोटी), निम्न दुधना (५२१.९२ कोटी), तिल्लारी (३११.४६ कोटी), निम्न वर्धा (५९0.८४ कोटी), निम्न पांझरा (१३१.0६), नांदुर मधमेश्वर फेज दोन (३६0.४३), गोसीखुर्द (५६0६.८८ कोटी), उर्ध्व पेनगंगा (७४३.८९), बोनबाळा (१६५६. २३ कोटी), तारली (३६६. ३४), धोम बलाकवाडी (३८४. ३५ कोटी), अर्जुन (२७७. ३७), उर्ध्व कुंडलिका (१0६.0२ कोटी), अरुणा (२७७.३७ कोटी), गडनदी (२६६.३९), कृष्णा कोयना (१६४३.८९ कोटी), डोंगरगाव (२.५९ कोटी), सांगोला शाखा कालवा (६४२.६३ कोटी), खडकपूर्णा (२६९.0८ कोटी), वारणा (८३१.३३ कोटी), मोरणा-गुरेघर (१0९.0९ कोटी), निम्न पेढी (५४४.५१ कोटी), वांग (१00.४0 कोटी), नरडवे-महमदवाडी (८५.९२ कोटी) आणि कुडाळी (२५१. ४४ कोटी) सिंचन निधी स्थापन करणारसिंचन निधी स्थापन करून हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यात राज्ये तसेच केंद्र सरकार यांचा सहभाग असेल. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी १९ हजार ६९४ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.